शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वाढीव पाणी नेमके जाते कुठे?

By admin | Updated: November 17, 2016 07:20 IST

महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठया बाबत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

सदानंद नाईक / उल्हासनगरमहापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठया बाबत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. वाढीव पाणी जाते कुठे? कमी दाबाने पुरवठा का होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आयुक्तांनी मागितली आहेत. तसेच तोटयाविना असलेल्या निळया पाईपवर कारवाईचे संकेत दिले आहेत. ‘लोकमत’च्या सोमवारच्या अंकात ‘३०० कोटी खर्चूनही पाणी योजना कोरडी’ ही बातमी ‘आॅन द स्पॉट’ अंतर्गत सविस्तर प्रसिद्ध झाली. याची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. उल्हासनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा शहराला होऊनही नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मागील महिन्यात पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्त निंबाळकर यांनी कॅम्प नं-५ कैलास कॉलनी या महापौर अपैक्षा पाटील यांच्या प्रभागात दौरा केला होता. त्यावेळी तोटयाविना असलेल्या निळया पाईपलाईप मधून लाखो लिटर पाणी गटारात जात असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले होते.आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी ते धाब्यावर बसविले. गेल्या १५ दिवसात एकावरही कारवाई झाली नसून याप्रकाराने विभागातील सावळागोधंळ उघड झाला आहे. तसेच ३०० कोटीच्या योजनेचे सुरवाती पासूनचे साक्षीदार असलेले कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांच्यावर कारवाई करून त्यांच्या हटावाच्या मागणीने जोर पकडला आहे. ७ लाखाच्या लोकसंख्येला १५५ एमएलडी पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. आयुक्तांनी सेलवन यांच्यासह अभियंते व अधिकाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी बैठक घेऊन पाणी पुरवठयाचा आढावा घेतला. मात्र आयुक्तांचे अधिकाऱ्यांच्या उत्तराने समाधन झाले नाही. पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बहुतांश कर्मचारी व अधिकारी मालमत्ता कर वसुलीच्या कामामध्ये जुंपले आहेत. असे असतांना करवसुलीचे श्रेय नागरी सुविधा केंद्र चालविणारा कंत्राटदार घेत आहे. करवसुली कार्यक्रमानंतर पाणीपुरवठा विभागावर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.शहरातील प्रत्येक चौकात कर भरणा केंद्र खाजगी कंत्राटदारामार्फत उभारून ती चालविण्यास दिली आहे. या केंद्रावर पालिका दरमहा ३० लाखापेक्षा अधिक खर्च करत असून ही लूट चालल्याचा आरोप होत आहे. असे केंद्र पालिका का चालवित नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी यांच्या चांगभल्यासाठी ही कर भरणा केंद्र उभारल्याची टीका विरोधकांनी केली आहे.