शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

वाढीव पाणी नेमके जाते कुठे?

By admin | Updated: November 17, 2016 07:20 IST

महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठया बाबत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

सदानंद नाईक / उल्हासनगरमहापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठया बाबत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. वाढीव पाणी जाते कुठे? कमी दाबाने पुरवठा का होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आयुक्तांनी मागितली आहेत. तसेच तोटयाविना असलेल्या निळया पाईपवर कारवाईचे संकेत दिले आहेत. ‘लोकमत’च्या सोमवारच्या अंकात ‘३०० कोटी खर्चूनही पाणी योजना कोरडी’ ही बातमी ‘आॅन द स्पॉट’ अंतर्गत सविस्तर प्रसिद्ध झाली. याची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. उल्हासनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा शहराला होऊनही नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मागील महिन्यात पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्त निंबाळकर यांनी कॅम्प नं-५ कैलास कॉलनी या महापौर अपैक्षा पाटील यांच्या प्रभागात दौरा केला होता. त्यावेळी तोटयाविना असलेल्या निळया पाईपलाईप मधून लाखो लिटर पाणी गटारात जात असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले होते.आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी ते धाब्यावर बसविले. गेल्या १५ दिवसात एकावरही कारवाई झाली नसून याप्रकाराने विभागातील सावळागोधंळ उघड झाला आहे. तसेच ३०० कोटीच्या योजनेचे सुरवाती पासूनचे साक्षीदार असलेले कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांच्यावर कारवाई करून त्यांच्या हटावाच्या मागणीने जोर पकडला आहे. ७ लाखाच्या लोकसंख्येला १५५ एमएलडी पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. आयुक्तांनी सेलवन यांच्यासह अभियंते व अधिकाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी बैठक घेऊन पाणी पुरवठयाचा आढावा घेतला. मात्र आयुक्तांचे अधिकाऱ्यांच्या उत्तराने समाधन झाले नाही. पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बहुतांश कर्मचारी व अधिकारी मालमत्ता कर वसुलीच्या कामामध्ये जुंपले आहेत. असे असतांना करवसुलीचे श्रेय नागरी सुविधा केंद्र चालविणारा कंत्राटदार घेत आहे. करवसुली कार्यक्रमानंतर पाणीपुरवठा विभागावर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.शहरातील प्रत्येक चौकात कर भरणा केंद्र खाजगी कंत्राटदारामार्फत उभारून ती चालविण्यास दिली आहे. या केंद्रावर पालिका दरमहा ३० लाखापेक्षा अधिक खर्च करत असून ही लूट चालल्याचा आरोप होत आहे. असे केंद्र पालिका का चालवित नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी यांच्या चांगभल्यासाठी ही कर भरणा केंद्र उभारल्याची टीका विरोधकांनी केली आहे.