शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘जागो ग्राहक जागो’ कधी होणार?

By admin | Updated: December 24, 2015 01:41 IST

ठाणे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही ग्राहक राजा झोपेतून जागा होण्याचे नाव घेत नाही,

भाग्यश्री प्रधान,  ठाणे ठाणे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही ग्राहक राजा झोपेतून जागा होण्याचे नाव घेत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे. २०१५ या वर्षात ११५२ ग्राहकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. त्यापैकी ९५० तक्रारींमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा न्याय मिळाला. मात्र एकूण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण बरेच नगण्य असल्याने जागो ग्राहक जागो हे ठाणेकरांच्या कधी काना-मनात शिरणार, असा सवाल ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत.ठाणे ग्राहक तक्रार निवारण मंचाची १९९१ मध्ये स्थापना करण्यात आली. गेल्या २४ वर्षांत त्यांच्याकडे १५ हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यामधील बहुतांश तक्रारदारांना दिलासा लाभला. गतवर्षीच्या तक्रारींच्या तुलनेत २०१५ या वर्षभरात नोंदवलेल्या व सोडवलेल्या तक्रारी तुलनेने कमी आहेत. सध्या बिस्कीटाच्या पुड्यात कमी वजनाची बिस्कीटे भरून ग्राहकांची दिशाभूल करण्यापासून महागडे फ्लॅट विकतांना घर खरेदीदाराला गंडवण्यापर्यंत अनेक प्रकार आजूबाजूला घडतात. मात्र तरीही फसवणूक झालेले ग्राहक त्याविरुद्ध दाद मागत नाहीत. ज्याने फसवणूक केली त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणे, फसवणूक करणारा प्रभावशाली व्यावसायिक, उद्योजक अथवा बिल्डर असेल तर त्याच्या विरोधात संघटीतपणे तक्रार करून लढा देणे असे प्रकार करण्यास ग्राहक धजावत नाही. बरेचदा दुर्लक्ष करणे किंवा जे पदरात पडेल ते स्वीकारणे अशी बोटचेपी भूमिका ग्राहक घेतो. त्यामुळे ग्राहकांना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जास्तीत जास्त तक्रारी पोहचाव्या, असे आवाहन गुरुवार २४ डिसेंबर रोजीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त करण्यात येत आहे. ग्राहकांच्या हितरक्षणाकरिता १९८६ सालापासून राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा केला जातो. एखादी कंपनी जर मालाचा उत्तम दर्जा न राखता, केवळ आकर्षक मार्केटींग करून पुरवठा करीत असेल तर त्याची खरेदी ग्राहकांनी करु नये. तसेच अशा फसवणुकीविरुद्ध तक्रार दाखल करावी हाच ग्राहक दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. ग्राहकाकडून पैसे घेऊन काहीवेळा दुकानदार फरार होतात किंवा ग्राहकाची फसवणूक करुन त्याच्याकडून जास्त पैसे उकळले, असे जाणवले तरीही ग्राहक तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकांनी सर्व पुराव्यानिशी तक्रार निवारण न्यायालयात हजर राहणे मात्र गरजेचे असते. मात्र अनेकजण तक्रार नोंदवूनही सुनावणीच्यावेळी न्यायलयात हजर राहत नाहीत. अशा प्रकरणात तक्रारीत सकृतदर्शनी कितीही तथ्य आढळले तरी तक्रारीचा निकाल देणे कठीण जाते, असे ग्राहक मंचातर्फे सांगण्यात आले.