शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

‘जागो ग्राहक जागो’ कधी होणार?

By admin | Updated: December 24, 2015 01:41 IST

ठाणे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही ग्राहक राजा झोपेतून जागा होण्याचे नाव घेत नाही,

भाग्यश्री प्रधान,  ठाणे ठाणे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही ग्राहक राजा झोपेतून जागा होण्याचे नाव घेत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे. २०१५ या वर्षात ११५२ ग्राहकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. त्यापैकी ९५० तक्रारींमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा न्याय मिळाला. मात्र एकूण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण बरेच नगण्य असल्याने जागो ग्राहक जागो हे ठाणेकरांच्या कधी काना-मनात शिरणार, असा सवाल ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत.ठाणे ग्राहक तक्रार निवारण मंचाची १९९१ मध्ये स्थापना करण्यात आली. गेल्या २४ वर्षांत त्यांच्याकडे १५ हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यामधील बहुतांश तक्रारदारांना दिलासा लाभला. गतवर्षीच्या तक्रारींच्या तुलनेत २०१५ या वर्षभरात नोंदवलेल्या व सोडवलेल्या तक्रारी तुलनेने कमी आहेत. सध्या बिस्कीटाच्या पुड्यात कमी वजनाची बिस्कीटे भरून ग्राहकांची दिशाभूल करण्यापासून महागडे फ्लॅट विकतांना घर खरेदीदाराला गंडवण्यापर्यंत अनेक प्रकार आजूबाजूला घडतात. मात्र तरीही फसवणूक झालेले ग्राहक त्याविरुद्ध दाद मागत नाहीत. ज्याने फसवणूक केली त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणे, फसवणूक करणारा प्रभावशाली व्यावसायिक, उद्योजक अथवा बिल्डर असेल तर त्याच्या विरोधात संघटीतपणे तक्रार करून लढा देणे असे प्रकार करण्यास ग्राहक धजावत नाही. बरेचदा दुर्लक्ष करणे किंवा जे पदरात पडेल ते स्वीकारणे अशी बोटचेपी भूमिका ग्राहक घेतो. त्यामुळे ग्राहकांना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जास्तीत जास्त तक्रारी पोहचाव्या, असे आवाहन गुरुवार २४ डिसेंबर रोजीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त करण्यात येत आहे. ग्राहकांच्या हितरक्षणाकरिता १९८६ सालापासून राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा केला जातो. एखादी कंपनी जर मालाचा उत्तम दर्जा न राखता, केवळ आकर्षक मार्केटींग करून पुरवठा करीत असेल तर त्याची खरेदी ग्राहकांनी करु नये. तसेच अशा फसवणुकीविरुद्ध तक्रार दाखल करावी हाच ग्राहक दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. ग्राहकाकडून पैसे घेऊन काहीवेळा दुकानदार फरार होतात किंवा ग्राहकाची फसवणूक करुन त्याच्याकडून जास्त पैसे उकळले, असे जाणवले तरीही ग्राहक तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकांनी सर्व पुराव्यानिशी तक्रार निवारण न्यायालयात हजर राहणे मात्र गरजेचे असते. मात्र अनेकजण तक्रार नोंदवूनही सुनावणीच्यावेळी न्यायलयात हजर राहत नाहीत. अशा प्रकरणात तक्रारीत सकृतदर्शनी कितीही तथ्य आढळले तरी तक्रारीचा निकाल देणे कठीण जाते, असे ग्राहक मंचातर्फे सांगण्यात आले.