शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदाची निवडणूक कधी?

By admin | Updated: March 9, 2017 02:59 IST

महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापपर्यंत सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. ८ फेब्रुवारीला ही निवडणूक

कल्याण : महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापपर्यंत सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. ८ फेब्रुवारीला ही निवडणूक होणार होती. परंतु, कोणतेही ठोस कारण न देता ती रद्द करण्यात आली. पीठासीन अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी अजूनही निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. महिला-बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेना गटाचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. समितीतील सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात आला. तत्पूर्वी समितीवर नव्या सदस्यांच्या प्रमाणशीर प्रतिनिधीत्वानुसार नियुकत्या करण्यासाठी २६ डिसेंबरला विशेष महासभा बोलावण्यात आली होती. यात नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, शीतल मंढारी, उर्मिला गोसावी, वैशाली भोईर (सर्व शिवसेना आघाडी गट),वैशाली पाटील, रेखा चौधरी, इंदिरा तरे, वृषाली पाटील-जोशी (सर्व भाजपा-कल्याण डोंबिवली विकास आघाडी) तर काँग्रेसच्या हर्षदा भोईर या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. मात्र, मनसेने गटनेते पदाच्या वैधानिक दर्जाच्या वादावर त्यांचा सदस्य समितीवर पाठवलेला नाही. त्यानंतर ८ फेब्रुवारीला सभापती पदाची निवडणूक जाहीर झाली होती.परंतु, सभापतीपदाचा यंदाचा टर्म भाजपाचा असताना मुंबई महापालिकेच्या धर्तीवर युतीमध्ये उद्भवलेल्या वादात शिवसेनेकडून शीतल मंढारी तर भाजपाकडून वैशाली पाटील यांनी स्वंतत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. परंतु, निवडणुकीच्या एक दिवस आधी अपरिहार्य कारणास्तव निवडणुकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना पाठवण्यात आले. त्यानुसार ही निवडणुक रद्द करावी लागली.दरम्यान, सदस्य निवड होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी निवडणुकीची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. याबाबत शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ठरला असताना तो असा अचानक स्थगित करता येतो का? कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला?, असे सवाल जाधव यांनी यापूर्वीच उपस्थित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक घेण्यासाठी वेळ मिळत नसेलतर त्यांनी आयएएस असलेल्या आयुक्त ई. रवींद्रन यांना पिठासीन अधिकारी म्हणून नेमावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)