शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

सभापतीपदाची निवडणूक कधी?

By admin | Updated: March 9, 2017 02:59 IST

महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापपर्यंत सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. ८ फेब्रुवारीला ही निवडणूक

कल्याण : महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापपर्यंत सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. ८ फेब्रुवारीला ही निवडणूक होणार होती. परंतु, कोणतेही ठोस कारण न देता ती रद्द करण्यात आली. पीठासीन अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी अजूनही निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. महिला-बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेना गटाचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. समितीतील सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात आला. तत्पूर्वी समितीवर नव्या सदस्यांच्या प्रमाणशीर प्रतिनिधीत्वानुसार नियुकत्या करण्यासाठी २६ डिसेंबरला विशेष महासभा बोलावण्यात आली होती. यात नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, शीतल मंढारी, उर्मिला गोसावी, वैशाली भोईर (सर्व शिवसेना आघाडी गट),वैशाली पाटील, रेखा चौधरी, इंदिरा तरे, वृषाली पाटील-जोशी (सर्व भाजपा-कल्याण डोंबिवली विकास आघाडी) तर काँग्रेसच्या हर्षदा भोईर या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. मात्र, मनसेने गटनेते पदाच्या वैधानिक दर्जाच्या वादावर त्यांचा सदस्य समितीवर पाठवलेला नाही. त्यानंतर ८ फेब्रुवारीला सभापती पदाची निवडणूक जाहीर झाली होती.परंतु, सभापतीपदाचा यंदाचा टर्म भाजपाचा असताना मुंबई महापालिकेच्या धर्तीवर युतीमध्ये उद्भवलेल्या वादात शिवसेनेकडून शीतल मंढारी तर भाजपाकडून वैशाली पाटील यांनी स्वंतत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. परंतु, निवडणुकीच्या एक दिवस आधी अपरिहार्य कारणास्तव निवडणुकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना पाठवण्यात आले. त्यानुसार ही निवडणुक रद्द करावी लागली.दरम्यान, सदस्य निवड होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी निवडणुकीची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. याबाबत शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ठरला असताना तो असा अचानक स्थगित करता येतो का? कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला?, असे सवाल जाधव यांनी यापूर्वीच उपस्थित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक घेण्यासाठी वेळ मिळत नसेलतर त्यांनी आयएएस असलेल्या आयुक्त ई. रवींद्रन यांना पिठासीन अधिकारी म्हणून नेमावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)