शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कमी पटसंख्येच्या शाळा बंद कधी?

By admin | Updated: August 6, 2015 23:35 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाने ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येची कसून चौकशी केली असता सुमारे

सुरेश लोखंडे ,ठाणेजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाने ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येची कसून चौकशी केली असता सुमारे ५८० शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आढळले होते. याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षातदेखील सुमारे ३९० शाळा आढळल्या आहेत. परंतु, शासन आदेशानुसार त्या बंद करण्यात ठाणे जिल्हा परिषद व महापालिका अपयशी ठरले आहेत. शैक्षणिक क्षेत्रासह शिक्षक वेतनावर शासनाचा मोठ्याप्रमाणात खर्च होत आहे. या तुलनेत लाभार्थी विद्यार्थी संख्या कमी आढळल्यामुळे राज्य शासनाने सुमारे एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनुदानित शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येचे सर्वेक्षण केले होते. कोणाचे हितसंबंध राखण्यासाठी ही हलगर्जी होते आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १७०० शाळा शिल्लक राहिल्या असता त्यातील सुमारे ३१६ शाळा बंद होण्यास पात्र ठरल्या होत्या. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी, दुर्गम भागात सुमारे १८५५ शाळा आहेत. यापैकी २६४ शाळांची पटसंख्या कमी असल्याचे आढळून आले आहेत. बहुतांशी आदिवासी कुटुंबे पाल्यासह गावपाडे सोडून कामासाठी अन्यत्र स्थलांतर करतात. यामुळे शाळेत बहुधा विद्यार्थी नसतोच. यानुसार ठाणे, पालघर जिल्ह्यांत सुमारे ५८० शाळा कोणत्याही क्षणी कायमस्वरूपी बंद होण्याचे संकेत मागील एक वर्षापासून आहेत. मात्र, त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. ती कशामुळे हा प्रश्न आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातील ३९० शाळांवर कारवाईची टांगती तलवार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांतील शाळांचा यात समावेश आहे. तर पालघरच्या जव्हार, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यांच्या शाळा बंद करण्यास पात्र ठरल्या आहेत. काही खाजगी शाळांवर कारवाई केली असता ठाणे जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे १७० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरविण्यात आलेले आहेत.