शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मार्गदर्शक सूचनांचा ‘श्रीगणेशा’ कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव दीड दिवसांचा साधेपणाने साजरा केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव दीड दिवसांचा साधेपणाने साजरा केला होता. यंदा कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. काही दिवसांवर गणेशोत्सव आला तरी स्थानिक पातळीवर केडीएमसीला गणेश मंडळांच्या बैठका घ्यायला तसेच मार्गदर्शक सूचना जाहीर करायला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. परिणामी कल्याण-डोंबिवली शहरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मागील वर्षी २२ ऑगस्टला गणपतींचे आगमन झाले होते. परंतु, जुलै व ऑगस्टमधील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कोरोनाचे सावट होते. केडीएमसीने त्यावेळी घरगुती व सार्वजनिक गणपतींचे आगमन आणि विसर्जनाबाबत सूचना जारी केल्या होत्या. गणेशमूर्तीच्या उंचीवरही मर्यादा होत्या. गर्दी टाळण्यासाठी श्री गणेशाच्या दर्शनासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑनलाइन सुविधांवर भर होता.

केडीएमसी हद्दीत २९१ नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळे आहेत. यंदा १० सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. आगमनाला काही दिवस शिल्लक असताना अद्याप केडीएमसीने गणेश मंडळांची बैठक अथवा उत्सव साजरा करण्याबाबत कोणत्याही सूचना केल्या दिलेल्या नाहीत. मनपा क्षेत्रात सध्या नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट कायम असल्याने मनपाने तातडीने बैठक घेऊन सूचना द्याव्यात, जेणेकरून गणेशोत्सव मंडळांतील संभ्रम दूर होईल, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे. यासंदर्भात मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

शुल्क आकारण्यात येऊ नये

- गेल्या वर्षी १० बाय १० फुटांच्या मंडपाचे बंधन होते. याचे जो पालन करेल, त्याला मात्र कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापेक्षा अधिक आकाराचा मंडप असेल तर पाच रुपये फूट याप्रमाणे शुल्क आकारले गेले होते. परंतु, यंदा कोणत्याही सूचना मनपाने दिलेल्या नाहीत. दरम्यान, शुल्क यंदा आकारू नये, अशी मागणी गणेश मंडळांची आहे.

- लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे नुकसान झाल्याने गणेश मंडळांनी यंदाही वर्गणी न काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात बहुतांश मंडळांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या पैशातून पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत केली आहे. तर, काही मंडळांनी गरजवंतांना धान्य वाटप, ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या बाबींचा विचार करून शुल्क माफ करावे, असे पत्र कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्था यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.

- डोंबिवलीतील अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक, सल्लागार प्रकाश भोईर यांनीही शुल्क आकारू नये, असे मत मांडले आहे. कोरोनाचे सावट आजही कायम आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाही वर्गणी गोळा केली जाणार नाही. मनपाने शुल्क माफ करून मंडळांना दिलासा द्यावा, याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे.

------------