शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

संमेलन कधी? कुठे? तुम्हाला काय सांगू?

By admin | Updated: January 12, 2017 07:17 IST

मालवणी महोत्सवातील काव्य संमेलनाप्रमाणे नाट्यसंमेलनालाही ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करावी.

ठाणे : मालवणी महोत्सवातील काव्य संमेलनाप्रमाणे नाट्यसंमेलनालाही ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करावी. म्हणजे मी संमेलनाध्यक्ष झाल्याने गर्दी वाढली, असा लोकांचा समज तरी होईल आणि मलाही बरे वाटेल, अशी खुसखुशीत टिप्पणी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केली. नाट्यसंमेलनाला सर्व रसिकांनी सगळ्यांनी जरुर यावे. उस्मानाबाद येथे आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संमेलन आहे, असे मी ऐकतोय. मी संमेलनाध्यक्ष असूनही मलाच ते कधी, कुठे होणार ते माहित नाही; तर तुम्हाला काय सांगू, असे वक्तव्यही त्यांनी केले.शिवाईनगर, उन्नती गार्ड येथे कोकण ग्रामविकास मंडळाने आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवात सोमवारी सावरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ठाण्यात रहायला आल्यावर आणि त्यातही गेल्या सहा महिन्यात माझे अनेक सत्कार झाले. ठाणे मला सर्वार्थाने लाभले. म्हणजे गेल्या ७२ वर्षात मला गिरगावात जो आॅक्सिजन मिळाला नाही, तो एका वर्षात ठाण्यात मिळाला; इतके मोकळेपण ठाण्यात आहे. पण या आकर्षणामुळे ठाण्याचाही आता गिरगाव होतो की काय अशी भीती वाटू लागली आहे, असे मतही त्यांनी मांडले. यावेळी प्रमुख पाहुणे कवी अशोक बागवे यांनीही मनोगत व्यक्त केले. आयोजक सीताराम राणे, कवयित्री शंकुतला चौधरी, संतोष राणे आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान धनश्री क्षीरसागर, तनुजा ढेरे, डॉ. प्रतिभा भिडे, दामोदर घाणेकर, मिलिंद पाटील, विनंती म्हात्रे, ज्योती गोडबोले, विनय होडे, कल्पना सुळे, दया घोंघे, यांना यंदाचा यमुनाबाई राणे साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविले. (प्रतिनिधी)