शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

केडीएमसी ‘तो’ अहवाल पाठवणार कधी?

By admin | Updated: May 22, 2017 01:55 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या मानसिक छळवणुकीचा प्रकार समोर आला होता. या संदर्भातील तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अ

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या मानसिक छळवणुकीचा प्रकार समोर आला होता. या संदर्भातील तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने मागितलेल्या चौकशी अहवालाकडे केडीएमसीचे मात्र पुरते दुर्लक्ष झाले आहे. जानेवारीत दिलेल्या आदेशात १५ दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना महापालिकेला करण्यात आल्या होत्या. परंतु, अद्यापपर्यंत अहवाल दिला गेलेला नाही. १९९८ मध्ये घडलेल्या जकात पावती फेरफार प्रकरणात मानसिक छळ करून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप विनायक लक्ष्मण गोडे या कर्मचाऱ्याने केला आहे. जकात विभागाचे तत्कालीन उपायुक्त रामनाथ सोनवणे, विनय कुलकर्णी, शांतीलाल राठोड, सच्चिदानंद कुलकर्णी, अनिल लाड, सुनील बागुल यांच्याविरोधात त्यांनी महापालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांकडेही तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे धाव घेतली. यात आयोगाने चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जानेवारीत दिले. २७ जानेवारीला आदिवासी विकास मंत्रालयानेही केडीएमसीकडून अहवाल मागितला.असे घडले प्रकरणगोडे हे जकात विभागात लिपिक असताना पावत्यांमध्ये झालेल्या फेरफार प्रकणात त्यांच्यावर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तत्कालीन जकात दक्षता पथकातील अधिकारी विनय कुलकर्णी, शांतीलाल राठोड व सच्चिदानंद कुलकर्णी यांनी तसा अहवाल सोनवणे यांना दिला. या अहवालावरून लिपिक गोडे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यासह ज्यांच्या पावत्यांमध्ये फेरफार दिसून आला त्या वाहतुकदाराविरोधात गुन्हा दाखल केला गेला. यात गोडे यांच्यावर फौजदारी कारवाई होऊन त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडीही भोगावी लागली. मात्र, या प्रकरणात केवळ अनुसूचित जाती-जमातीचा असल्याने आपल्याला नाहक गुंतवल्याचा व मानसिक त्रास दिल्याचा त्यांचा आरोप आहे. अन्य कर्मचाऱ्यांच्या पावत्यांमध्येही फेरफार झाला असताना त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, कारवाई झाली नाही, याकडे गोडे यांनी लक्ष वेधले आहे. त्यातच चौकशी अधिकारी अनिल लाड यांनी त्यांचा चौकशीचा अहवाल प्रशासनाला सादर केला नाही. त्यात आयुक्तांची मंजुरी न घेता चौकशी अधिकारी असलेल्या माधव पटवर्धन यांच्याकडे दुसऱ्यांदा नव्याने चौकशी लावण्यात आली. त्यांच्या चौकशीत निर्दाेष सिद्ध झालो असतानाही प्रशासनाने याची योग्य ती दखल घेतली नाही, असे गोडे म्हणाले.