शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

समांतर रस्ता सुस्थितीत येणार कधी?; पावसाळ्यात अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:12 IST

कल्याणहून डोंबिवलीला तसेच डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी नजीकचा पर्याय म्हणून रेल्वे समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

डोंबिवली : पावसाळा कधीही सुरू होईल, अशी परिस्थिती असताना चार महिन्यांपूर्वी ड्रेनेजलाइन टाकण्याकामी खोदलेल्या कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. सध्या सुस्थितीत नसलेल्या रस्त्यावरून वाहने चालवणे जिकिरीचे बनले असताना पावसाळ्यात खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याणहून डोंबिवलीला तसेच डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी नजीकचा पर्याय म्हणून रेल्वे समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कल्याण-शीळ मार्गावरची वाहतूककोंडी तसेच इंधनाचा होत असलेला अपव्यय पाहता केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. आजघडीला या रस्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुस्थितीतील समांतर रस्त्याला वाहनचालकांची पसंती मिळत असताना दुसरीकडे या रस्त्यावरील ठाकुर्ली रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर जानेवारीमध्ये अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. तेथील गृहसंकुलांना ड्रेनेजव्यवस्थेशी जोडण्याचे काम केडीएमसीच्या वतीने हाती घेण्यात आले होते. ड्रेनेजसाठी खोदकाम करायचे होते, तर ते आधी करणे आवश्यक होते.सुस्थितीत, चांगला रस्ता त्या कामासाठी खोदण्यात आला. चार महिने हे काम सुरू होते, पण काही गृहसंकुलांपुरतेच ते मर्यादित राहिले. जो रस्ता म्हसोबा चौकातून खंबाळपाडा येथे जातो, त्या रस्त्यावरही एका बाजूकडील मार्गावर ड्रेनेजलाइन टाकण्यात आली. हे काम सुरू होते, तेव्हा कोणतीही सूचना अथवा कामाच्या माहितीचा फलक लावला नव्हता. त्यामुळे नेमका कोणत्या कामासाठी रस्ता खोदला गेला आहे, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम होता.

खड्ड्यांच्या ठिकाणी केवळ मातीचा भरावकाम आता पूर्ण झाले असले, तरी त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी मातीचा भराव टाकून त्यावर खडी टाकण्यात आली आहे. डांबर न टाकल्याने अर्ध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर टाकलेली खडी बाहेर पडून इतरत्र विखुरली आहे. पावसाळ्याआधी हा रस्ता सुस्थितीत येईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण, पावसाळा तोंडावर आला तरी केडीएमसीला येथे डांबरीकरणासाठी मुहूर्त मिळालेला नाही. पावसाळ्यात खड्डेमय आणि चिखलमय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.