शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

तलाव म्हणजे नक्की काय?...

By admin | Updated: September 25, 2015 02:17 IST

‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅग लाईनखाली तलावांचा जीर्णोद्धार या लोकमतने हाती घेतलेल्या मोहिमेत ‘तलाव म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे

ठाणे : ‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅग लाईनखाली तलावांचा जीर्णोद्धार या लोकमतने हाती घेतलेल्या मोहिमेत ‘तलाव म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. शहरातील अनेक तलाव एकामागून एक नामशेष होऊ लागल्याने तलावांची नेमकी व्याख्या पुढे आली आहे. अनेकांनी त्यांचे नैसर्गिक सौंदर्य वाचविण्याचे आवाहन महापालिकेसह सामाजिक संस्थांना केले आहे.तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच तलाव शिल्लक राहिले आहेत. आजच्या घडीला ६५ पैकी केवळ ३५ तलावच शिल्लक आहेत. जे आहेत, त्यावर महापालिका लाखो रुपयांचा निधी खर्च करते. शहरातील तलावांचे सुशोभिकरण करताना त्यांचे कॉक्रीटीकरण केले जाते. त्यामुळे त्याला कळत नकळत एखाद्या टँकचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात शिल्लक राहिलेल्या तलावांची परिस्थिती गंभीर स्वरुप धारण करीत आहे. जर तलाव टिकवायचे असतील तर येथे लोकांचा वावर किती आहे? याबाबत दरवर्षी तलावांचे आॅडिट होणे गरज आहे. तसेच तलावांत विविध माध्यमातून होणाऱ्या प्रदूषण लक्षात घेता त्याची वारंवार तपासणी होणेही तितकेच गरजे असल्याचे बोलले जात आहे. शहरातील कोलबाड, सिद्धेश्वर, मांसुदा, कचराली तलाव आदी दिसणाऱ्या तलावांचे सुशोभिकरण करताना लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, या खर्चानंतर त्याचे टँकमध्ये रुपांतर होते. याउलट तलाव म्हणजे गावांमध्ये दिसणारे जिथे नैसर्गिकरित्या असलेले चिखल, गवत आणि स्वच्छ पाण्यात आपली तृष्णा भागविण्यासाठी कलबिलाट करणारे विविध पक्षी येणे गरजे आहे. मात्र, कावळ्यांना आणणे म्हणजे तलाव होत नाही. याबाबत तलावांचे सुशोभिकरण करणाऱ्या संस्थांनी काळजी घ्यावी. त्यातूनच किमान त्यांचा जिर्णोद्धार होऊन ठाणेकरांसाठी ते पिकनिक स्पॉटसाठी अथवा विरंगुळ्यासाठी उपलब्ध होईल असेही सूर आता ठाणेकरांमध्ये उमटू लागले आहेत. (प्रतिनिधी)