शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

तलाव म्हणजे नक्की काय?...

By admin | Updated: September 25, 2015 02:17 IST

‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅग लाईनखाली तलावांचा जीर्णोद्धार या लोकमतने हाती घेतलेल्या मोहिमेत ‘तलाव म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे

ठाणे : ‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅग लाईनखाली तलावांचा जीर्णोद्धार या लोकमतने हाती घेतलेल्या मोहिमेत ‘तलाव म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. शहरातील अनेक तलाव एकामागून एक नामशेष होऊ लागल्याने तलावांची नेमकी व्याख्या पुढे आली आहे. अनेकांनी त्यांचे नैसर्गिक सौंदर्य वाचविण्याचे आवाहन महापालिकेसह सामाजिक संस्थांना केले आहे.तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच तलाव शिल्लक राहिले आहेत. आजच्या घडीला ६५ पैकी केवळ ३५ तलावच शिल्लक आहेत. जे आहेत, त्यावर महापालिका लाखो रुपयांचा निधी खर्च करते. शहरातील तलावांचे सुशोभिकरण करताना त्यांचे कॉक्रीटीकरण केले जाते. त्यामुळे त्याला कळत नकळत एखाद्या टँकचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात शिल्लक राहिलेल्या तलावांची परिस्थिती गंभीर स्वरुप धारण करीत आहे. जर तलाव टिकवायचे असतील तर येथे लोकांचा वावर किती आहे? याबाबत दरवर्षी तलावांचे आॅडिट होणे गरज आहे. तसेच तलावांत विविध माध्यमातून होणाऱ्या प्रदूषण लक्षात घेता त्याची वारंवार तपासणी होणेही तितकेच गरजे असल्याचे बोलले जात आहे. शहरातील कोलबाड, सिद्धेश्वर, मांसुदा, कचराली तलाव आदी दिसणाऱ्या तलावांचे सुशोभिकरण करताना लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, या खर्चानंतर त्याचे टँकमध्ये रुपांतर होते. याउलट तलाव म्हणजे गावांमध्ये दिसणारे जिथे नैसर्गिकरित्या असलेले चिखल, गवत आणि स्वच्छ पाण्यात आपली तृष्णा भागविण्यासाठी कलबिलाट करणारे विविध पक्षी येणे गरजे आहे. मात्र, कावळ्यांना आणणे म्हणजे तलाव होत नाही. याबाबत तलावांचे सुशोभिकरण करणाऱ्या संस्थांनी काळजी घ्यावी. त्यातूनच किमान त्यांचा जिर्णोद्धार होऊन ठाणेकरांसाठी ते पिकनिक स्पॉटसाठी अथवा विरंगुळ्यासाठी उपलब्ध होईल असेही सूर आता ठाणेकरांमध्ये उमटू लागले आहेत. (प्रतिनिधी)