शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

डोंबिवलीत रिक्षेला पर्याय काय?

By admin | Updated: July 5, 2017 06:11 IST

रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारमुळे शहरातील प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. सध्या पावसाळ््यात रात्री साडेआठ नंतर रिक्षाच मिळत

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारमुळे शहरातील प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. सध्या पावसाळ््यात रात्री साडेआठ नंतर रिक्षाच मिळत नाहीत. लोकलच्या गर्दीतून घुसमटलेल्या प्रवाशांना रिक्षेसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत. त्यांच्या संतापाला सामोरे जाताना रिक्षेला नवा वाहतुकीचा पर्याय देण्याचे नवे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर उभे आहे.रेल्वे स्थानकालगतच्या रिक्षा तळांवर विशेषत: रात्री ८.३० नंतर रिक्षाच नसतात. त्यामुळे तेथे रात्री ११ पर्यंत प्रवाशांची रांग असते. रिक्षा कमी असल्याने प्रवाशांचा लोंढा वाढतो. रिक्षा मिळत नसल्याने प्रवाशांच्या संताप होतो. मागील आठवड्यात दोनदा प्रवाशांनी रिक्षा रोखून धरल्या होत्या. वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस गोविंद गंभीरे यांनी कशीबशी परिस्थिती हातळली असली तरीही पावसाळ््यातील पुढील तीन महिने अशीच स्थिती राहिल्यास प्रवाशांचा उद्रेक होण्याची भीती आहे. रात्रीच्या वेळी अशा घटना घडत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, याचे दडपण वाहतूक विभागासमोर आहे.प्रवाशांसाठी मागील आठवड्यात वाहतूक विभागाने केडीएमटीची मदत केळकर रोड ते ग्रोगासवाडी व्हाया मानपाडा रोडदरम्यान दोन ते तीन बस फेऱ्या चालवल्या. पण या फेऱ्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे जास्तीच जास्त बस रात्री रस्त्यावर आणावण्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. गंभीरे यांच्या विनंतीमुळे एका खासगी बसचालकानेही प्रवाशांना सुविधा दिली. पण त्यात सातत्य राहणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले.पावसाळ््यात रिक्षांना मागणी जास्तरिक्षा रस्त्यावर नसल्याची समस्या पावसाळ््यात मोठ्या प्रमाणावर जाणवते. अन्य मोसमांमध्ये नागरिक सायंकाळीही रिक्षा करतातच असे नाही. पण पावसाळ््यात ज्याला त्याला घाई असते. त्यामुळे रिक्षांची मागणी वाढते. पण रिक्षाचालकही दिवसभर पावसातच व्यवसाय करतो. त्यात काहींना दिवसभराचे उत्पन्न मिळते. तर काही जण पावसाचा जोर बघूनच रिक्षा बाहेर काढत नाहीत, असे रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर म्हणाले.पावसाळ््यात खड्ड्यांमुळेही कोंडी होते. त्यातही अनेकदा रिक्षा अडकतात. रिक्षाचालकांना रस्त्यावर उतरण्यासाठी सक्ती कशी करणार? पण याप्रश्नी उपाययोजना, तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करण्याची तयारी आहे, असेही ते म्हणाले.