शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

सांडपाण्यापोटी पुन्हा कल्याणला दंड?

By admin | Updated: December 22, 2015 00:18 IST

कल्याण-डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रिया न करताच उल्हास नदीत आणि खाडीत सोडले जात असल्याने एकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने बँक गॅरंटीची रक्कम वाढवली

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रिया न करताच उल्हास नदीत आणि खाडीत सोडले जात असल्याने एकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने बँक गॅरंटीची रक्कम वाढवली असतानाच राष्ट्रीय हरीत लवादानेही पालिकेला दंड ठोठावला आहे. तो विषय मार्गी लागण्याअगोदरच मलवाहिन्या, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे जोडण्याचे कामही नव्याने तीन महिने लांबणीवर पडले आहे. तसे झाल्यास पालिकेवर पुन्हा दंड भरण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत. सध्या २१६ दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी अवघ्या ७३ दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रक्रिया करते. उरलेले तसेच नाले-गटारांवाटे कल्याण खाडीला जाऊन मिळते. असे पाणी थेट खाडीत सोडत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेकडून बँक गॅरंटी भरुन घेते.प्रक्रिया करण्यास जितका उशीर होतोत्या प्रमाणात बँक गॅरंटीची रक्कम वाढते. त्यातच उल्हास नदी, कल्याण खाडीच्या प्रदूषणास जबाबदार असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला राष्ट्रीय हरीत लवादानेही १५ कोटींचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण न्यायालयात असतानाच आता प्रक्रिया केंद्रे जोडण्याचे काम तीन महिने लांबणीवर पडले आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या वाहिन्या आणि मल प्रक्रिया केंद्रे जोडून ती कार्यान्वित करण्याची अंतिम मुदत याच महिन्यात संपली. मात्र मोठागाव ठाकुर्ली येथील केंद्र वाहिनीशी जोडण्याचे काम प्रगतीपथावर हे काम मार्चपर्यंत लांबल्याचा दावा पालिका प्रशासने केला आहे.२७ गावांसाठी भुयारी गटार योजना तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प तयार करण्यात आला आहे. २७ गावांसाठी ४० दशलक्ष लिटर क्षमतेची, मोहने अटाळी आणि बल्याणी गावासाठी आठ दशलक्ष लिटर क्षमतेची मलनिस्सारण केंद्रे उभारण्याचे प्रस्ताव आहेत. हे प्रकल्प केंद्र सरकारकडून मंजूर झाल्यास सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता २२८ दशलक्ष लिटर होईल.