शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आम्हाला स्वतंत्र नगरपालिका नको, २७ गावांमधील नगरसेवकांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:04 IST

२७ गावांमधील नगरसेवकांची भूमिका : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत असले, तरी या २७ गावांतील नगरसेवकांना गावे महापालिकेतच हवी आहेत. स्वतंत्र नगरपालिकेला त्यांचा विरोध असून, तशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.१९८३ पासून ही गावे महापालिकेत होती. २००२ मध्ये ही गावे तत्कालीन आघाडी सरकारने वगळली. पुन्हा २०१५ मध्ये ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली.

या गावांतून सर्वच राजकीय पक्षांबरोबर अपक्ष नगरसेवकांनी निवडणूक लढवली. या गावांतील नगरसेवकांनी गावांच्या विकासासाठी विविध मागण्या महापालिकेकडे केल्या आहेत. महापालिकेत राहूनच या गावांचा विकास होईल, अशी त्यांची भावना आहे. कल्याण-मलंग रस्ता ४५ फुटांचा असून, त्यावर ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तसेच २७ गावांसाठी १९२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. तिचे सध्या काम सुरू आहे. गावांचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. मात्र, त्यांचा सुनियोजित विकास झालेला नाही. यंदाच्या पावसळ्यात गावातील रस्ते वाहून गेले. महापालिका प्रशासनाने त्यासाठी ३२७ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र, त्याला सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही.दुसरीकडे, केडीएमसीतून गावे वगळण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती आग्रही आहे. या प्रश्नावर समितीने पाच वर्षे लढा दिला आहे. तसेच न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. गावे वगळण्यासंदर्भात सरकारकडून केवळ आश्वासन दिले गेले. मात्र, त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने २७ गावांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर गावांतील नगरसेवकांनी त्याला विरोध केला आहे. त्यांच्या मते स्वतंत्र नगरपालिका केल्यास या गावांचा विकास होणार नाही. महापालिकेतच राहून विकास केला जाऊ शकतो. नगरसेवकांनी गावे वगळण्याच्या मागणीला छेद देणारी मागणी केल्याने गावे वगळण्याच्या मुद्यावर दोन मतप्रवाह पुढे आले आहेत. गावे वगळण्यास विरोध करणारे नगरसेवक मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, विनोद काळण, कुणाल पाटील, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, रविना माळी, आशालता बाबर, पूजा म्हात्रे, रूपाली म्हात्रे, प्रमिला पाटील, इंदिरा तरे, सोनी अहिरे, ऊर्मिला गोसावी, विमल भोईर, सुनीता खंडागळे यांनी त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. त्यामुळे गावे वगळण्याच्या सरकारी बैठकीच्या वेळी या गटालाही सरकारला बोलवावे लागणार आहे.बिल्डरलॉबीचा दबावगावे वगळण्याच्या मुद्यावर बिल्डर लॉबी सक्रिय आहे. या लॉबीचा सरकारवर दबाव आहे. बड्या बिल्डरांना स्वतंत्र नगरपालिका हवी. कारण, त्यांच्याकडे महापालिकेची मालमत्ताकराची थकबाकी आहे. स्वतंत्र नगरपालिका कररचना कमी असेल, यासाठी बिल्डर गावे वगळण्याच्या मागणीला अप्रत्यक्षरीत्या जोर लावत आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका