शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ९० झोपडपट्ट्यांच्या विकासाचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

ठाणे : जिल्ह्यातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे (एसआरए) प्रस्ताव मंजुरीकरिता मुंबईत जात असल्याने होणाऱ्या विलंबामुळे तब्बल ९० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत ...

ठाणे : जिल्ह्यातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे (एसआरए) प्रस्ताव मंजुरीकरिता मुंबईत जात असल्याने होणाऱ्या विलंबामुळे तब्बल ९० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता ठाणे महापालिकेची खेवरा सर्कल येथील संपूर्ण इमारत एसआरए प्राधिकरणाने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतल्याने दफ्तर दिरंगाई संपुष्टात आली आहे. एकाच छताखाली ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर, उल्हासनगर अशा आठ महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर, अलिबाग, पेण, खोपोली, माथेरान आणि कर्जत अशा सात नगरपालिकांच्या क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रस्ताव ठाण्यातून मंजूर होणार आहेत. त्यामुळे झोपडपट्ट्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे.

ठाणे महापालिकेने खेवरा सर्कल येथे भाजी मंडईसाठी इमारत उभारली आहे. परंतु तेथे मंडई सुरू झाली नाही. २०१४मध्ये येथील दुसरा मजला एसआरए कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर दिला. ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने ठाण्यात हे कार्यालय सुरू केले. त्यामुळे प्रस्ताव झटपट मंजूर व्हावे, अशी अपेक्षा होती. परंतु एसआरचे मुख्यालय हे मुंबईत असल्याने व मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबईत बसत असल्याने ठाणे कार्यालय सुरू होऊन योजनेला गती आली नाही. त्यामुळे ठाण्यातच एसआरएचे स्वतंत्र प्राधिकरण सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू होता. प्राधिकरण सुरू करण्याकरिता इमारतीचा तळ मजला आणि पहिला मजला भाडेतत्त्वावर मागितला होता. अखेर या संदर्भातील प्रस्ताव येत्या १८ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. या प्रस्तावानुसार ८२३.५४ चौ.मी. क्षेत्राच्या कार्यालयासाठी तीन लाख ८७ हजार २५६ रुपयांचे भाडे आकारले जाणार आहे. तसेच पहिल्या मजल्यावरील ७४५.६६ चौ.मी.साठी तीन लाख ५० हजार ६३४ रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. पुढील ११ वर्षांसाठी हे कार्यालय एसआरए प्राधिकरणाला दिले जाणार आहे. ठाणे येथे एसआरएचे स्वतंत्र प्राधिकरण सुरू होणार आहे.

...........

या महापालिकांना होणार फायदा

ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. येथील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल आदी महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, माथेरान, खोपोली, अलिबाग आणि पेण या नगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रस्ताव ठाण्यात मंजूर होतील व नागरिकांनादेखील हक्काची घरे मिळतील.

...........

ठाण्यात ९० झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत

ठाण्यात एसआरएचे कार्यालय असेल तरी प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबईलाच जावे लागत होते. ठाण्यात दहा लाख नागरिक झोपडपट्ट्यांत वास्तव्य करतात. ६७ झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आतापर्यंत झाल्याने २५ ते ३० हजार झोपडीधारकांना पक्की घरे मिळाली आहेत. आजही तब्बल ९० प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. आता ठाण्यातच स्वतंत्र प्राधिकरण स्थापन होत असल्याने या प्रस्तावांचा मार्ग मोकळा होणार आहे.

..........