शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शिरलेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील नदी व खाडी किनारी राहणाऱ्या तसेच सखल भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी ...

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील नदी व खाडी किनारी राहणाऱ्या तसेच सखल भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करून त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली.

डोंबिवली खाडी परिसर, मोठा गाव ठाकुर्ली, कोपर परिसरासह कल्याण खाडीलगत असलेला रेतीबंदर परिसर, वालधुनीनजीक असलेल्या योगीधाम, अनुपमनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासनगर, अशोकनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यांच्या गृहोपयोगी वस्तू, विजेवर चालणारी उपकरणे आदीचे मोठे नुकसान झाले. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करावे. अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला द्यावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.

यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता, पावसामुळे घरांचे नुकसान झाले असले तरी यापुढेही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र येत्या सोमवारपासून पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत.

........

कल्याण-डोंबिवली शहराला २०१९ साली अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला होता. त्यावेळी तहसील कार्यालयातर्फे पंचनामे करण्यात आले होते. मात्र नुकसानग्रस्त घरांपैकी केवळ ३० टक्के लोकांना आर्थिक भरपाई मिळाली होती. उर्वरित ७० टक्के नागरिकांना भरपाई मिळालीच नाही. मागील नुकसान भरपाईची रक्कम आणि आता झालेल्या नुकसानीची रक्कम दोन्ही द्यावी, असे म्हात्रे म्हणाले.

----------------------------------

वाचली