शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गावांना पाणी द्या, नाहीतर कार्यालयात बसू देणार नाही

By admin | Updated: March 23, 2017 01:32 IST

कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांमधील पाणीटंचाईचा मुद्दा बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत गाजला

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांमधील पाणीटंचाईचा मुद्दा बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत गाजला. सभापती रमेश म्हात्रे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांना फैलावर घेतले. काहीही करा, पण गावांना पाणी द्या. नुसत्या खुर्च्या उबवू नका. गुरूवारपर्यंत कृती आराखडा सादर झाला पाहिजे; अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही, असा सज्जड दम म्हात्रे यांनी दिला.स्थायी समितीच्या सभेला सुरूवात होताच म्हात्रे यांनीच सभागृहात गावांमधील पाणीटंचाईचा मुद्दा मांडला. पाणी समस्येवर महापालिका मुख्यालयावर मोर्चे काढण्यात आले. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांत हाणामारीचे प्रसंग घडले यांची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने कोणती ठोस कारवाई केली? असा सवाल त्यांनी कार्यकारी अभियंता पाठक यांना केला. पाणीबिलापोटी ८५ कोटींच्या थकबाकीकडेदेखील संबंधित गावांमधील नगरसेवकांचे त्यांनी लक्ष वेधले. ही थकबाकी भरली जाईल, यासाठी नगरसेवकांनीही प्रयत्न करावे, असे त्यांनी सुचवले. (प्रतिनिधी)