शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
3
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
4
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
5
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
6
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
8
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
9
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
10
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
11
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
12
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
13
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
14
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
15
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
16
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
17
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
18
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
19
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
20
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'

उल्हासनगरमध्ये पाणी पेटणार

By admin | Updated: March 8, 2017 04:16 IST

पालिका निवडणुकीचा घुरळा खाली बसताच पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. अनियमित पाणापुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले असून परिस्थितीत

उल्हासनगर : पालिका निवडणुकीचा घुरळा खाली बसताच पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. अनियमित पाणापुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले असून परिस्थितीत सुधारणा झाली नाहीतर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. अनियमित पाणीपुरवठयामुळे नागरिक कुठल्याही क्षणी रस्त्यावर उतरु शकतात असा इशारा देणारे पत्र एमआयडीसीला दिले आहे. एमआयडीसीकडून अनिमियत पाणीपुरवठा होत असल्याचे तुणतुणे पालिका सातत्याने वाजवत आहे. एमआयडीसीच्या पाणी तक्त्यावरून लोकसंख्येच्या प्रमाणात दुप्पट पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे. मग वाढीव पाणी जाते कुठे? असा सवाल विचारला जात आहे. मुबलक पाणीपुरवठ्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ३०० कोटीची पाणीवितरण योजना राबविली. पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या दुर्लक्षतेमुळे योजना ठप्प पडली. मुख्यमंत्र्यांनी योजनेच्या चौकशीचे आदेश दिले. त्याचे पुढे काय झाले? केवळ कागदीघोडे नाचविण्यात धन्यता मानली जात आहे.शहरातील कॅम्प नं-४ ओटी सेक्शन, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, दहाचाळ, तानाजीनगर, समातानगर, करोतियानगर, डॉल्फिन हॉटेलसह संपूर्ण शहरामध्ये पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. या भागात आठवड्यातून तीन ते चार दिवस अनियमित व अर्धा तास पाणीपुरवठा होतो. याबाबत आयुक्तांकडे तक्रारींचा पाऊस पडला असून अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर पाणीसमस्या सोडविणार असल्याचे सांगितले. यापूर्वी ज्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली त्याची थेट चौकशी करून समस्या सोडविली जात होती. त्यामुळे नागरिकांचे समाधान होऊन कमीतकमी पिण्यासाठी त्यांना पाणी मिळत होते. आता मात्र तसे होताना दिसत नसल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या परिसरातील नागरिकांनी ५० टक्यापेक्षा कमी मालमत्ता कर भरला त्यांना सुविधा देणार नाही अशी भूमिका निंबाळकर यांनी गेल्यावर्षी घेतली होती. तसेच थकित मालमत्ता कर वसुलीसाठी थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर किन्नरांचा बँडबाजा वाजविणार असा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. मग पिण्याचे पाणी न देणाऱ्या पालिकेसमोर किन्नरांना का नाचवू नये? असा प्रश्न गेल्यावर्षी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरूण अशांत यांनी आयुक्तांना विचारून खळबळ उडून दिली होती. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)निंबाळकर हे तुकाराम मुंढेंच्या मार्गावर- महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहर कचरामुक्त केले. तसेच थकित मालमत्ता कर वसुलीसह इतर निर्णय अचूक घेतल्याने नागरिक त्यांच्या पाठिशी उभे राहिले. - कालांतराने नगरसेवकांसह नागरिक, समाजसेवक यांच्या तक्रारी ऐकायला त्यांना वेळ नसल्याचा आरोप होत आहे. असेच राहिल्यास नवी मुंबई प्रमाणे आयुक्तांविरोधात ठराव आणावा लागेल, अशी पुस्ती बहुतांश नगरसेवकांनी जोडली. दिवसाला १२० टँकरच्या फेऱ्या : गेल्यावर्षी पाणीटंचाईमुळे शहरात दिवसाला १६० च्या आसपास टँकरच्या फेऱ्या होत होत्या. सध्या टंचाईग्रस्त भागात १०० ते १२० फेऱ्या होत आहेत. शहरातील ७० टक्के हातपंप सुरु आहेत. तेथूनच नागरिक घेऊन जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. श्रीमंतांच्या परिसरात मुबलक पाणीएमआयडीसीकडून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. झोपडपट्टी भागात आठवडयातून दोन ते तीन दिवस अपुरा पाणीपुरवठा तर गर्भश्रीमंत परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत आहे. गेल्यावर्षी टंचाईच्यावेळी निळया पाईपला तोटया नसल्याने लाखो लिटर पाणी गटारत जात असल्याचे आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात उघड झाले असून अद्यापही तोटया बसविल्या नसल्याचे उघड झाले आहे.