शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

उल्हासनगरात पाणीटंचाई पुन्हा उडणार हाहाकार?

By admin | Updated: March 21, 2017 01:40 IST

उल्हासनगरातील लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. उल्हास नदीची पाणीपातळी

उल्हासनगरातील लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. उल्हास नदीची पाणीपातळी गुरुवारी एक मीटरने खाली गेल्यावर, एमआयडीसीने पम्पिंग स्टेशनमधील मशीनमध्ये कचरा शिरू नये, म्हणून काही काळ पाणीउपसा बंद केला होता. यामुळे दोन दिवस पश्चिमेत पाणीटंचाई निर्माण झाली. असा प्रसंग पुन्हा ओढवू नये म्हणून, पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पाटबंधारे विभागाला नदीत वेळीच पाणी सोडण्याची विनंती केली.महापालिकेकडे स्वत:ची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे पाण्यासाठी पूर्णत: एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. याचा फायदा एमआयडीसी अधिकारी घेत आहेत. पाणीपुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर येताच ते थकीत पाणीबिलाचे कारण पुढे करतात. शहराला अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करत आहेत. शहराला दररोज १२० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असून त्याचे बिल एमआयडीसी महापालिकेला पाठवत आहे. इतके पाणी मिळूनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे पाणी जाते कुठे, असा प्रश्न महापालिका व नागरिकांना पडत आहे. शहरातील पाणीवितरण व्यवस्था ५० वर्षे जुनी आहे. पाणीगळतीचे प्रमाण ३० ते ३५ टक्के आहे. ३०० कोटींची पाणीवितरण योजना सात वर्षांपासून राबवली आहे. मात्र, काही कारणास्तव योजना रखडल्याने पाणीसमस्या कायम आहे.एमआयडीसीच्या पाले व जांभूळ जलसाठ्यातून शहराच्या पूर्वेला ३७, तर शहाड गावठाण जलसाठ्यातून पश्चिमेला ८५ ते ९० एमएलडी पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहत असल्याने त्याचा परिणाम पुढील दोन दिवस पाणीवितरणावर होतो. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवस पाणी नागरिकांना मिळत आहे. मात्र, तेही अपुरे असल्याने नागरिकांत असंतोष आहे. आयुक्त निंबाळकर यांनी एमआयडीसीला पत्र पाठवून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या प्रकाराला जबाबदार धरण्याचा इशाराही दिला आहे.-सदानंद नाईक, उल्हासनगर