शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

उल्हासनगरात पाणीटंचाई पुन्हा उडणार हाहाकार?

By admin | Updated: March 21, 2017 01:40 IST

उल्हासनगरातील लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. उल्हास नदीची पाणीपातळी

उल्हासनगरातील लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणीपुरवठा होऊनही शहरात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. उल्हास नदीची पाणीपातळी गुरुवारी एक मीटरने खाली गेल्यावर, एमआयडीसीने पम्पिंग स्टेशनमधील मशीनमध्ये कचरा शिरू नये, म्हणून काही काळ पाणीउपसा बंद केला होता. यामुळे दोन दिवस पश्चिमेत पाणीटंचाई निर्माण झाली. असा प्रसंग पुन्हा ओढवू नये म्हणून, पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पाटबंधारे विभागाला नदीत वेळीच पाणी सोडण्याची विनंती केली.महापालिकेकडे स्वत:ची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे पाण्यासाठी पूर्णत: एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. याचा फायदा एमआयडीसी अधिकारी घेत आहेत. पाणीपुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर येताच ते थकीत पाणीबिलाचे कारण पुढे करतात. शहराला अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करत आहेत. शहराला दररोज १२० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असून त्याचे बिल एमआयडीसी महापालिकेला पाठवत आहे. इतके पाणी मिळूनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे पाणी जाते कुठे, असा प्रश्न महापालिका व नागरिकांना पडत आहे. शहरातील पाणीवितरण व्यवस्था ५० वर्षे जुनी आहे. पाणीगळतीचे प्रमाण ३० ते ३५ टक्के आहे. ३०० कोटींची पाणीवितरण योजना सात वर्षांपासून राबवली आहे. मात्र, काही कारणास्तव योजना रखडल्याने पाणीसमस्या कायम आहे.एमआयडीसीच्या पाले व जांभूळ जलसाठ्यातून शहराच्या पूर्वेला ३७, तर शहाड गावठाण जलसाठ्यातून पश्चिमेला ८५ ते ९० एमएलडी पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहत असल्याने त्याचा परिणाम पुढील दोन दिवस पाणीवितरणावर होतो. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवस पाणी नागरिकांना मिळत आहे. मात्र, तेही अपुरे असल्याने नागरिकांत असंतोष आहे. आयुक्त निंबाळकर यांनी एमआयडीसीला पत्र पाठवून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या प्रकाराला जबाबदार धरण्याचा इशाराही दिला आहे.-सदानंद नाईक, उल्हासनगर