शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

पेंढरघोळ गावाची पाणीटंचाई झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:35 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाणीटंचाई दूर झाली आहे. येथे नव्याने १९ लाख ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाणीटंचाई दूर झाली आहे. येथे नव्याने १९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जलकुंभातून शुक्रवारपासून पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली. ‘लोकमत’ने यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आटगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर बरोरा, विद्यमान कृषी पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, सरपंच पद्मावती बरोरा, उपसरपंच राजेंद्र निमसे यांनी पाठपुरावा करून ही योजना राबविण्यात यश मिळविले आहे.

पेंढरघोळ या ९५० लोकसंख्या असणाऱ्या गावाला अनेक वर्षे पाणीटंचाई जाणवत होती. मात्र सरपंच, उपसरपंच यांनी सातत्याने पाठपुरावा करून १९ लाख रुपये खर्च करून जलकुंभ बांधला. या पाड्याला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सभापती सुषमा लोणे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, सभापती रेश्मा मेमाणे, उपसभापती जगन्नाथ पस्टे, पुरुषोत्तम भेरे, अरुण शेलार यांनी जलकुंभ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खंडू बरोरा तसेच ग्रामविकास अधिकारी संजय सावंत यांच्या उपस्थितीत गावाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. कंत्राटदार राजेश विशे, दत्ता चाळके यांनी विशेष प्रयत्न करून हा पाणीपुरवठा सुरळीत केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.

भावली धरणातून शहापूर तालुक्याला पाणीपुरवठा झाला तर शहापूर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असे पांडुरंग बरोरा यांनी सांगितले. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी या वेळी सांगितले