शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरघोळ गावाची पाणीटंचाई झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:35 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाणीटंचाई दूर झाली आहे. येथे नव्याने १९ लाख ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाणीटंचाई दूर झाली आहे. येथे नव्याने १९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जलकुंभातून शुक्रवारपासून पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली. ‘लोकमत’ने यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आटगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर बरोरा, विद्यमान कृषी पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, सरपंच पद्मावती बरोरा, उपसरपंच राजेंद्र निमसे यांनी पाठपुरावा करून ही योजना राबविण्यात यश मिळविले आहे.

पेंढरघोळ या ९५० लोकसंख्या असणाऱ्या गावाला अनेक वर्षे पाणीटंचाई जाणवत होती. मात्र सरपंच, उपसरपंच यांनी सातत्याने पाठपुरावा करून १९ लाख रुपये खर्च करून जलकुंभ बांधला. या पाड्याला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सभापती सुषमा लोणे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, सभापती रेश्मा मेमाणे, उपसभापती जगन्नाथ पस्टे, पुरुषोत्तम भेरे, अरुण शेलार यांनी जलकुंभ बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खंडू बरोरा तसेच ग्रामविकास अधिकारी संजय सावंत यांच्या उपस्थितीत गावाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. कंत्राटदार राजेश विशे, दत्ता चाळके यांनी विशेष प्रयत्न करून हा पाणीपुरवठा सुरळीत केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.

भावली धरणातून शहापूर तालुक्याला पाणीपुरवठा झाला तर शहापूर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असे पांडुरंग बरोरा यांनी सांगितले. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी या वेळी सांगितले