शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : तापमानाचा पार वाढत असताना कल्याण ग्रामीण भागातील बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. डोंबिवलीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : तापमानाचा पार वाढत असताना कल्याण ग्रामीण भागातील बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. डोंबिवलीतील सांगाव-सांगर्ली प्रभागातील नागरिक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. पाणीसमस्या सोडवावी, यासाठी तेथील भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी वारंवार शहरातील एमआयडीसीच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, एमआयडीसीने त्याला केराची टोपली दाखविल्याने पाटील यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना पाणीकपात रद्द न केल्यास आणि पाण्याचे समान वितरण न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा पत्राद्वारे गुरुवारी दिला आहे.

उन्हाळा सुरू होताच काही भागांतील रहिवाशांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. एमआयडीसी आणि महापालिका प्रशासन यांच्यात पाणी बिल थकबाकीवरून अनेक वर्षांपासून तिढा सुटत नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. कधी पाणीकपात, तर कधी टंचाई, यामुळे तेथील रहिवासी घराबाहेर पहाटे चार वाजता नळावर पाणी भरण्यासाठी रांग लावतात. टँकरने पाणी मागवावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारतात, त्यांना उत्तर काय देणार, असा सवाल पाटील यांनी केला.

२७ गावांची पाणी बिल थकले आहे. केडीएमसीने २०१६ मध्ये २७ गावांच्या पाणी बिलापोटी फक्त पाच कोटी रुपयांचा भरणा एमआयडीसीकडे केला होता. उर्वरित ४१८ कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी व नियमित देयकांचा भरणा होत नसल्याने एमआयडीसीने २७ गावांत पाणीकपात करावे लागत असल्याचे केडीएमसाला पत्राद्वारे कळविले आहे. वास्तविक, २७ गावे मनपात समाविष्ट झाल्यानंतर तेथील गावांना पाणी, रस्ते आणि इतर सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळवून देणे ही मनपाची जबाबदारी आहे, असे पाटील म्हणाल्या. मनपा यातून मार्ग काढण्याऐवजी पाणी बिल थकवत आली आहे. गेली पाच वर्षे मनपा हेच करीत आल्याने गावांतील जनतेला पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. नागरिक मात्र लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारत आहेत. लोकप्रतिनिधी एमआयडीसी, तर कधी मनपा कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र, थकबाकी भरत नाही, तोपर्यंत पाणीकपात करीत राहणार, अशी एमआयडीसीची भूमिका असल्याचे समजले. त्यामुळे या सर्वांवर तत्काळ उपाययोजना करा, अन्यथा पाण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

-----------