शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पाणीसमस्या मिटली; भातसासह बारवी धरणात ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या ...

ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के, तर बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराची पाणीसमस्या आता मिटली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणांत काही अंशी पाणीसाठा कमी आहे.

बारवी धरणात अवघा १८६९ मि.मी. पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आतापर्यंत २६२३ मि.मी. पाऊस पडला आहे. कान्होळला २००१ मि.मी., पाटगावला १९२२ मि.मी. आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मि.मी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा ८९.९६ टक्के झाला आहे. या बारवी धरणाची आजची पाणीपातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात मंगळवारी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही यंदा ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी भातसामध्ये ९५.३७ टक्के साठा होता. या भातसा व बारवी धरणांच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आता जास्त पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणीसाठा यंदा ६८.५६ टक्के झाला आहे.