शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पाणीसमस्या मिटली; भातसासह बारवी धरणात ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या ...

ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के, तर बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराची पाणीसमस्या आता मिटली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणांत काही अंशी पाणीसाठा कमी आहे.

बारवी धरणात अवघा १८६९ मि.मी. पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आतापर्यंत २६२३ मि.मी. पाऊस पडला आहे. कान्होळला २००१ मि.मी., पाटगावला १९२२ मि.मी. आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मि.मी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा ८९.९६ टक्के झाला आहे. या बारवी धरणाची आजची पाणीपातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात मंगळवारी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही यंदा ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी भातसामध्ये ९५.३७ टक्के साठा होता. या भातसा व बारवी धरणांच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आता जास्त पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणीसाठा यंदा ६८.५६ टक्के झाला आहे.