शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पाणीसमस्या मिटली; भातसासह बारवी धरणात ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या ...

ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के, तर बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराची पाणीसमस्या आता मिटली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणांत काही अंशी पाणीसाठा कमी आहे.

बारवी धरणात अवघा १८६९ मि.मी. पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आतापर्यंत २६२३ मि.मी. पाऊस पडला आहे. कान्होळला २००१ मि.मी., पाटगावला १९२२ मि.मी. आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मि.मी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा ८९.९६ टक्के झाला आहे. या बारवी धरणाची आजची पाणीपातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात मंगळवारी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही यंदा ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी भातसामध्ये ९५.३७ टक्के साठा होता. या भातसा व बारवी धरणांच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आता जास्त पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणीसाठा यंदा ६८.५६ टक्के झाला आहे.