शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पाणीटंचाई जीवावर बेतली!

By admin | Updated: December 7, 2015 08:57 IST

सलग दोन दिवसांची पाणीकपात आणि अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, यामुळे घराबाहेरील खदाणीतील पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा रविवारी

कल्याण : सलग दोन दिवसांची पाणीकपात आणि अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, यामुळे घराबाहेरील खदाणीतील पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा रविवारी बुडून मृत्यू झाला. डोंबिवलीनजीकच्या भोपर गावात दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. प्रमिला (४०) आणि निखिल आजरा (१८) अशी मृतांची नावे असून, पाणीटंचाईमुळे झालेल्या या मृत्यूंबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.भोपर येथे राहणारी प्रमिला अन्य महिलांसमवेत कपडे धुण्यासाठी पाणवठ्यावर गेली होती. यावेळी तिच्यासोबत मुलगा निखिल हादेखील होता. कपडे धूत असताना, प्रमिलाचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. तेथे उपस्थित असलेल्या अन्य महिलांनी मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. आई पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचवण्यासाठी निखिल यानेदेखील पाण्यात उडी मारली, परंतु त्यालाही पोहता येत नसल्याने तोही बुडू लागला. या घटनेची माहिती तत्काळ डोंबिवली अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना सर्वप्रथम निखिलचा मृतदेह हाती लागला, तर तळाला गाळात फसलेला प्रमिलाचा मृतदेह शोधण्यात तेथील स्थानिक रहिवासी आणि पट्टीचा पोहणारा आशीष गिजे या १५ वर्षीय मुलाला यश आले. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)