शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

उल्हासनगरात पाणीगळती ३५ टक्क्यांवर

By admin | Updated: April 2, 2016 03:06 IST

शहरातील २८७ कोटींची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांनंतरही अर्धवट आहे. ९० टक्के पाणीपुरवठा नव्याऐवजी जुन्या जलवाहिन्यांतून होत असल्याने ३५ टक्के गळती होत आहे.

- सदानंद नाईक,  उल्हासनगरशहरातील २८७ कोटींची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांनंतरही अर्धवट आहे. ९० टक्के पाणीपुरवठा नव्याऐवजी जुन्या जलवाहिन्यांतून होत असल्याने ३५ टक्के गळती होत आहे. एकूणच पाणीवितरण योजना फसल्याची माहिती पालिका अधिकारी खाजगीत देत आहेत. उल्हासनगरातील जलवाहिन्या ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. त्यावर झोपडपट्टी, इमारती उभ्या राहिल्या असून त्या गटार व नाल्यांतून गेल्या आहेत. त्याच्या गळतीचे प्रमाण ३५ टक्के आहे. संपूर्ण शहरात नव्याने जलवाहिन्या टाकून जलकुंभ उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पाणीवितरण योजना मागील आठ वर्षांपासून राबवली जात आहे. या योजनेतून जलवाहिन्यांऐवजी थेट जलकुंभातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. १२६ कोटींची योजना २८७ कोटींवर गेली असून त्यातून १० टक्केही पाणीपुरवठा होत नसल्याचे उघड झाले आहे.शहरात नव्या जलवाहिन्या टाकून ११ उंच तर एक भूमिगत जलकुंभ योजनेंतर्गत उभारले आहे. तसेच पंपिंग स्टेशन बांधले आहे. ४५ हजार पाणीमीटर बसवली आहेत. दुर्दैवाने आठ वर्षांनंतरही योजनेचे काम अपूर्ण असल्याने पालिकेला जुन्याच जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. ऐन पाणीटंचाईच्या दरम्यान नव्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा झाला असता तर गळती कमी होऊन पाणीबाणी निर्माण झाली नसती, असे बोलले जात आहे. २८७ कोटींच्या योजनेव्यतिरिक्त बहुतांश नगरसेवकांनी आपल्या प्रभागात अत्यावश्यक कामाच्या नावाखाली कोट्यवधीच्या जलवाहिन्या नव्याने टाकल्या आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जलकुंभ भरतच नाही. नाइलाजाने थेट वाहिनीतून पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पाणीवितरण असमान होत आहे. झोपडपट्टी भागात अर्धा तास तर उच्चभ्रूंच्या भागात दिवसाला दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसीकडून अनियमित पाणीपुरवठा पाणीटंचाईच्या निषेधार्थ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले. एमआयडीसीकडून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. तो सुरळीत करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच भातसातून २० एमएलडीसह वाढीव पाणीपुरवठ्याची ग्वाही दिली आहे.