शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात पाणीगळती ३५ टक्क्यांवर

By admin | Updated: April 2, 2016 03:06 IST

शहरातील २८७ कोटींची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांनंतरही अर्धवट आहे. ९० टक्के पाणीपुरवठा नव्याऐवजी जुन्या जलवाहिन्यांतून होत असल्याने ३५ टक्के गळती होत आहे.

- सदानंद नाईक,  उल्हासनगरशहरातील २८७ कोटींची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांनंतरही अर्धवट आहे. ९० टक्के पाणीपुरवठा नव्याऐवजी जुन्या जलवाहिन्यांतून होत असल्याने ३५ टक्के गळती होत आहे. एकूणच पाणीवितरण योजना फसल्याची माहिती पालिका अधिकारी खाजगीत देत आहेत. उल्हासनगरातील जलवाहिन्या ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. त्यावर झोपडपट्टी, इमारती उभ्या राहिल्या असून त्या गटार व नाल्यांतून गेल्या आहेत. त्याच्या गळतीचे प्रमाण ३५ टक्के आहे. संपूर्ण शहरात नव्याने जलवाहिन्या टाकून जलकुंभ उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पाणीवितरण योजना मागील आठ वर्षांपासून राबवली जात आहे. या योजनेतून जलवाहिन्यांऐवजी थेट जलकुंभातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. १२६ कोटींची योजना २८७ कोटींवर गेली असून त्यातून १० टक्केही पाणीपुरवठा होत नसल्याचे उघड झाले आहे.शहरात नव्या जलवाहिन्या टाकून ११ उंच तर एक भूमिगत जलकुंभ योजनेंतर्गत उभारले आहे. तसेच पंपिंग स्टेशन बांधले आहे. ४५ हजार पाणीमीटर बसवली आहेत. दुर्दैवाने आठ वर्षांनंतरही योजनेचे काम अपूर्ण असल्याने पालिकेला जुन्याच जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. ऐन पाणीटंचाईच्या दरम्यान नव्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा झाला असता तर गळती कमी होऊन पाणीबाणी निर्माण झाली नसती, असे बोलले जात आहे. २८७ कोटींच्या योजनेव्यतिरिक्त बहुतांश नगरसेवकांनी आपल्या प्रभागात अत्यावश्यक कामाच्या नावाखाली कोट्यवधीच्या जलवाहिन्या नव्याने टाकल्या आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जलकुंभ भरतच नाही. नाइलाजाने थेट वाहिनीतून पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पाणीवितरण असमान होत आहे. झोपडपट्टी भागात अर्धा तास तर उच्चभ्रूंच्या भागात दिवसाला दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसीकडून अनियमित पाणीपुरवठा पाणीटंचाईच्या निषेधार्थ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले. एमआयडीसीकडून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. तो सुरळीत करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच भातसातून २० एमएलडीसह वाढीव पाणीपुरवठ्याची ग्वाही दिली आहे.