शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न दोन वर्षांत सुटणार; स्थायी सभापतींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:42 IST

२७ गावांसाठी १९१ कोटी रुपयांच्या निविदेस मंजुरी

कल्याण : केडीएमसी हद्दीतील २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत १९१ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेस सोमवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. समितीने मंजुरीचा ठराव आजच वाचून कायम केला. आता हा ठराव राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाईल. त्यानंतर, योजनेच्या प्रत्यक्ष कामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यावर योजनेचे काम १८ महिन्यांत पूर्णत्वास येईल, अशी माहिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. त्यामुळे २७ गावांतील पाणीप्रश्न दोन वर्षांत निकाली निघेल, असा दावा त्यांनी केला आहे.

जून २०१५ मध्ये २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. या गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. २०१५ पूर्वी गावांच्या पाणीपुरवठ्याचे बिल ग्रामपंचायतीकडून भरले जात होते. महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत १५० दशलक्ष लीटरची पाणीपुरवठा योजना कल्याण-डोंबिवली शहरांसाठी आखली होती. तेव्हा २७ गावे महापालिकेत नसल्याने त्यांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन त्यात नव्हते. मात्र, भाजप सरकारने २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्याने केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेस सरकारने २०१६ मध्ये मंजुरी दिली. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून १५ टक्के, राज्य सरकारकडून ३३ टक्के आणि महापालिकेचा ५० टक्के, असा निधीचा सहभाग आहे.

२०१६ पासून या योजनेसाठी नऊ वेळा निविदा मागवण्यात आल्या. मात्र, त्यात काही तांत्रिक त्रुटी होत्या. एकदा राज्य सरकारने योजनेची निविदा रद्द केली होती. दरम्यान, प्रकल्पाची रक्कम वाढल्याने वाढीव डीएसआर रेटनुसार सरकारने या योजनेच्या प्रकल्प खर्चास ११ कोटींची वाढीव रक्कम मंजूर करून योजनेचा एकूण खर्च १९१ कोटी रुपये केला. नव्या मंजुरीनुसार पुन्हा निविदा मागविली गेली. त्यात एल.सी. इन्फ्रा प्रोजेक्ट्स या अहमदाबादच्या कंपनीने भरलेली निविदा आयुक्तांनी स्वीकारली. परंतु, ही निविदा १२ टक्के जास्त दराची होती. अखेर, चर्चेअंती हा दर नऊ टक्के करून त्याच्या दराच्या निविदेस मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवला गेला.

समितीने या निविदेस सोमवारी मंजुरी दिली. त्यामुळे दोन वर्षे निविदा प्रक्रियेत अडकलेल्या पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आठवडाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा विषय तातडीने मंजूर तसेच वाचून कायम करून अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. आचारसंहितेपूर्वी सरकारकडून मंजुरी देण्याचे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हात्रे यांना दिले आहे. या योजनेतून २७ गावांत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे ही कामे केली जाणार आहेत.

२७ गावांपैकी चार जागांत जलकुंभ उभारण्यासाठी जागा नाही. तेथील नगरसेवकांनी आयुक्तांना पत्र देऊन जलकुंभासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे.निविदा जादा दराची का?निविदा नऊ टक्के जास्तीच्या दराची आहे. याविषयी म्हात्रे म्हणाले, या निविदेचे स्वरूप अन्य निविदांच्या तुलनेत वेगळे आहे. या निविदेत कंत्राटदार कंपनीला वाढीव खर्च देण्याची तरतूद नसल्याने वाढीव दराची निविदा मंजूर केली आहे.

पाणीबिलाची थकबाकी भरा२७ गावे महापालिकेत समाविष्ट नसताना २०१५ पूर्वीपासून गावांना पाणीपुरवठा केल्याच्या बदल्यात गावांकडून एमआयडीसीला पाणीबिलाची थकबाकी येणे आहे. काही भाग महापालिकेने उचलला होता. आजमितीस २७ गावांतून १४ कोटी रुपयांची पाणीबिलाची थकबाकी भरलेली नाही. तसेच चालू पाणीबिलाची रक्कम आठ कोटी, अशी एकूण २२ कोटी भरणे अपेक्षित आहे. २७ गावांतील नागरिकांनी पाणीबिलाची थकबाकी व चालू बिल त्वरित भरावे, असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका