शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्ह्यात उद्यापासून पाणीकपात

By admin | Updated: November 17, 2015 00:49 IST

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळी सणाकरिता तात्पुरती स्थगित केली होती.

ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळी सणाकरिता तात्पुरती स्थगित केली होती. त्यामुळे या क्षेत्रातील पाण्याची चंगळ संपली असून पाणीकपात लागू होणार असल्याने संकट घोंगावू लागले आहे. जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात विविध दिवशी ४८ तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणेकरांवर येत्या बुधवारपासूनच पाणीकपातीचे संकट घोंगावणार असल्याने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला सध्या ४७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. पाणीकपातीमुळे ठाणे शहरात बुधवारी तर कळवा-मुंब्य्रात गुरु वार आणि शुक्र वार असा दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी, जलसंपदा विभाग आणि स्टेम कंपनीकडील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. तर, एमआयडीसीनेदेखील दोन दिवस पाणीकपातीचे संकेत दिल्याने ठाणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाणीकपात सहन करावी लागणार असल्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.