शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जुलै महिन्यात पाणीकपातीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येत्या पाच दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले नाही तर ऐन पावसाळ्यात ...

सुरेश लोखंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : येत्या पाच दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले नाही तर ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात पाणीकपात लागू करण्याची वेळ येईल. गेल्या १५ दिवसांपासून येथील पाऊस गायब झाला असून चक्क कडक ऊन पडत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भातसा धरणात केवळ १९ टक्के तर बारवी धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीकपातीचे संकट गडद झाले आहे.

जिल्ह्यातील शहरे, गावपाडे व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पावसाने गेल्या पंधरवड्यापासून दडी मारली आहे. भातसाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा जून महिन्यात ४७९ मि.मी. तर बारवी धरणात ७६४.५९ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात पाणीसाठा कमी आहे. पुढील पाच दिवसांत पावसाचे पुनरागमन न झाल्यास प्रशासनाला ऐन पावसाळ्यात पाणी कपात करावी लागेल.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी या महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद क्षेत्र आणि जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना (एमआयडीसी) बार्शी या एकमेव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणातील पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. जुलैमध्ये अवघा २७ टक्के पाऊस बारवी धरणाच्या खानिवरे, कान्होळ, पाटगाव आणि ठाकूरवाडी आदी पाणलोट क्षेत्रात पडला. पाऊस सुरू नसल्याने या धरणाखालील पाणी उचलण्याची संधी नाही. त्यामुळे धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. या धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उद्योगधंदे, कारखान्यांना रोज पाणीपुरवठा करावा लागत आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डी. एस. राठोड यांनी सांगितले.

बारवीत अपेक्षेपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे एप्रिलमध्ये पाणीकपात करण्यात आली नाही. दरवर्षी १५ जुलैपर्यंत चांगला पाऊस होऊन पाणीकपात रद्द होते. मात्र यंदा पावसाने जूनमध्ये हजेरी लावल्यानंतर दीर्घकाळ हुलकावणी दिल्याने जुलै महिन्यात कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली.

-------