शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्यात पाणीकपातीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येत्या पाच दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले नाही तर ऐन पावसाळ्यात ...

सुरेश लोखंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : येत्या पाच दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले नाही तर ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात पाणीकपात लागू करण्याची वेळ येईल. गेल्या १५ दिवसांपासून येथील पाऊस गायब झाला असून चक्क कडक ऊन पडत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भातसा धरणात केवळ १९ टक्के तर बारवी धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीकपातीचे संकट गडद झाले आहे.

जिल्ह्यातील शहरे, गावपाडे व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पावसाने गेल्या पंधरवड्यापासून दडी मारली आहे. भातसाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा जून महिन्यात ४७९ मि.मी. तर बारवी धरणात ७६४.५९ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात पाणीसाठा कमी आहे. पुढील पाच दिवसांत पावसाचे पुनरागमन न झाल्यास प्रशासनाला ऐन पावसाळ्यात पाणी कपात करावी लागेल.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी या महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद क्षेत्र आणि जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना (एमआयडीसी) बार्शी या एकमेव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणातील पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. जुलैमध्ये अवघा २७ टक्के पाऊस बारवी धरणाच्या खानिवरे, कान्होळ, पाटगाव आणि ठाकूरवाडी आदी पाणलोट क्षेत्रात पडला. पाऊस सुरू नसल्याने या धरणाखालील पाणी उचलण्याची संधी नाही. त्यामुळे धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. या धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उद्योगधंदे, कारखान्यांना रोज पाणीपुरवठा करावा लागत आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डी. एस. राठोड यांनी सांगितले.

बारवीत अपेक्षेपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे एप्रिलमध्ये पाणीकपात करण्यात आली नाही. दरवर्षी १५ जुलैपर्यंत चांगला पाऊस होऊन पाणीकपात रद्द होते. मात्र यंदा पावसाने जूनमध्ये हजेरी लावल्यानंतर दीर्घकाळ हुलकावणी दिल्याने जुलै महिन्यात कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली.

-------