शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्यात पाणीकपातीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येत्या पाच दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले नाही तर ऐन पावसाळ्यात ...

सुरेश लोखंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : येत्या पाच दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले नाही तर ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात पाणीकपात लागू करण्याची वेळ येईल. गेल्या १५ दिवसांपासून येथील पाऊस गायब झाला असून चक्क कडक ऊन पडत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भातसा धरणात केवळ १९ टक्के तर बारवी धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीकपातीचे संकट गडद झाले आहे.

जिल्ह्यातील शहरे, गावपाडे व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पावसाने गेल्या पंधरवड्यापासून दडी मारली आहे. भातसाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा जून महिन्यात ४७९ मि.मी. तर बारवी धरणात ७६४.५९ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात पाणीसाठा कमी आहे. पुढील पाच दिवसांत पावसाचे पुनरागमन न झाल्यास प्रशासनाला ऐन पावसाळ्यात पाणी कपात करावी लागेल.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी या महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद क्षेत्र आणि जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना (एमआयडीसी) बार्शी या एकमेव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणातील पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. जुलैमध्ये अवघा २७ टक्के पाऊस बारवी धरणाच्या खानिवरे, कान्होळ, पाटगाव आणि ठाकूरवाडी आदी पाणलोट क्षेत्रात पडला. पाऊस सुरू नसल्याने या धरणाखालील पाणी उचलण्याची संधी नाही. त्यामुळे धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. या धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उद्योगधंदे, कारखान्यांना रोज पाणीपुरवठा करावा लागत आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डी. एस. राठोड यांनी सांगितले.

बारवीत अपेक्षेपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे एप्रिलमध्ये पाणीकपात करण्यात आली नाही. दरवर्षी १५ जुलैपर्यंत चांगला पाऊस होऊन पाणीकपात रद्द होते. मात्र यंदा पावसाने जूनमध्ये हजेरी लावल्यानंतर दीर्घकाळ हुलकावणी दिल्याने जुलै महिन्यात कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली.

-------