शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाणी आले... पण वीज गेली

By admin | Updated: July 12, 2016 02:36 IST

मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केव्हाही वीज गायब होत असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत.

ठाणे : मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केव्हाही वीज गायब होत असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत. घोडबंदर परिसर, नौपाडा, कोपरी, दिवा, मुंब्रा आदींसह इतर भागांतही विजेचा लहरी कारभार सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्याची अनेक कारणे सांगितली जात असली तरी खरी कारणे काय, याचे उत्तर मात्र महावितरणकडे नाही. घोडबंदर भागातील मानपाडा, शिवाजीनगर, मनोरमानगर, गणेशनगर आदी भागांत दिवसातून १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांत अंडरग्राउंड वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, तर घोडबंदरच्या काही भागांमध्ये आजही ओव्हरहेड वीजपुरवठा सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्यामागे जोरदार पाऊस हेच कारण असल्याचा सूर महावितरण लावत आहे. ओव्हरहेड लाइनच्या ठिकाणी कार्बन पकडणे, कंडक्टर डॅमेज होणे आदींसह इतर ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या ठाणे विभागात रोज १५० च्या आसपास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येतात.परंतु, एका तक्रारीवर काम करीत असताना पुन्हा दुसरी तक्रार, अशा तक्रारी वाढतच असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी मान्य केले. गेले दोन दिवस डोंबिवली, कल्याणमधील अनेक भागांत दोन-चार तास वीज गायब आहे. विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण आहेत.गेल्याच आठवड्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी महावितरणच्या विविध तक्रारींबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. शिंदेंनी कल्याणमध्येही बैठक घेतली होती. त्याचे काय झाले आणि शिवसेना कधीपासून बैठका-चर्चा करायला लागली, असा संतप्त सवालही त्रस्त नागरिकांनी विचारला.... तरीही पाण्याची बोंब आहेचठाणे, कल्याण-डोंबिवलीत बहुतांशी गृहनिर्माण सोसायट्या असून त्यांना पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईचे संकट दूर झाले, तरी वीज नसल्याने सोसायट्यांच्या टाकीत मुबलक पाणी असूनही ते रहिवाशांना देता येत नाही. त्यामुळे अस्मानी संकटातून सुटलेले महावितरणच्या सुलतानी पाणीसंकटाचे बळी ठरले आहेत.