शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पाणी आले... पण वीज गेली

By admin | Updated: July 12, 2016 02:36 IST

मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केव्हाही वीज गायब होत असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत.

ठाणे : मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केव्हाही वीज गायब होत असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत. घोडबंदर परिसर, नौपाडा, कोपरी, दिवा, मुंब्रा आदींसह इतर भागांतही विजेचा लहरी कारभार सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्याची अनेक कारणे सांगितली जात असली तरी खरी कारणे काय, याचे उत्तर मात्र महावितरणकडे नाही. घोडबंदर भागातील मानपाडा, शिवाजीनगर, मनोरमानगर, गणेशनगर आदी भागांत दिवसातून १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांत अंडरग्राउंड वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, तर घोडबंदरच्या काही भागांमध्ये आजही ओव्हरहेड वीजपुरवठा सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्यामागे जोरदार पाऊस हेच कारण असल्याचा सूर महावितरण लावत आहे. ओव्हरहेड लाइनच्या ठिकाणी कार्बन पकडणे, कंडक्टर डॅमेज होणे आदींसह इतर ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या ठाणे विभागात रोज १५० च्या आसपास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येतात.परंतु, एका तक्रारीवर काम करीत असताना पुन्हा दुसरी तक्रार, अशा तक्रारी वाढतच असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी मान्य केले. गेले दोन दिवस डोंबिवली, कल्याणमधील अनेक भागांत दोन-चार तास वीज गायब आहे. विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण आहेत.गेल्याच आठवड्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी महावितरणच्या विविध तक्रारींबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. शिंदेंनी कल्याणमध्येही बैठक घेतली होती. त्याचे काय झाले आणि शिवसेना कधीपासून बैठका-चर्चा करायला लागली, असा संतप्त सवालही त्रस्त नागरिकांनी विचारला.... तरीही पाण्याची बोंब आहेचठाणे, कल्याण-डोंबिवलीत बहुतांशी गृहनिर्माण सोसायट्या असून त्यांना पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईचे संकट दूर झाले, तरी वीज नसल्याने सोसायट्यांच्या टाकीत मुबलक पाणी असूनही ते रहिवाशांना देता येत नाही. त्यामुळे अस्मानी संकटातून सुटलेले महावितरणच्या सुलतानी पाणीसंकटाचे बळी ठरले आहेत.