शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
3
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
4
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
7
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
8
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
9
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
10
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
11
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
12
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
13
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
14
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
15
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
16
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
17
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
18
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
19
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
20
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?

कचरा प्रक्रिया प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:30 IST

जागेअभावी १० कोटींचा निधी पडून

उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत बायोगॅस प्रकल्प आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी शासनाकडून १० कोटींचा निधी आला. महापालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याने निधी पडून असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्हासनगर महापालिकेसमोर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न उभा ठाकला असतानाच कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने उसाटणे येथे ३० एकर जागेची मागणी शासनाकडे केली आहे. सहा महिन्यांपूर्वी जागा देण्यास राज्य शासनाने तत्त्वत: मान्यता दिली; मात्र ही जागा अद्याप हस्तांतरित झालेली नाही.स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधकाम व पाडकाम प्रकल्पासाठी एक कोटी ४५ लाख, सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी ६५ लाख, बायोगॅस प्रकल्पासाठी तीन कोटी ४९ लाख आणि कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी महापालिकेला मिळाला. बायोगॅस आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागेच्या शोधात पालिका असून जागेअभावी १० कोटींच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. कचराप्रक्रिया, बायोगॅस प्रकल्प सुरू झाल्यास डम्पिंगवर जाणारा सुकया आणि ओल्या कचºयात मोठी घट होणार आहे. शिवसेना शहरप्रमुख आणि सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी आरोग्य विभागाला प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेक खुल्या जागेचा पर्याय दिल्याची माहिती दिली. मात्र, पालिकेकडे जागेची मालकी नसल्याने प्रकल्प उभारणी लांबल्याचे केणी यांनी सांगितले.महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित?कचºयावर प्रक्रिया झाल्यास डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असे मत सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले. कॅम्प नं. ३ येथील स्मशानभूमीशेजारील जागा, मलनि:सारण केंद्राजवळील जागा, आयडीआय कंपनीजवळील भूखंड, कॅम्प नं. २ स्मशानभूमीशेजारील जागा, रिजन्सी गृहसंकुलाशेजारील पालिकेला हस्तांतरित झालेला दोन एकरचा भूखंड तसेच विद्युत विभागाचा भूखंड, कॅम्प नं. ५ येथील परिवहनसेवेचा भूखंड या पर्यायी जागा असल्याचे चौधरी म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर