शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कचऱ्याचे राजकारण पेटले

By admin | Updated: May 6, 2017 06:00 IST

कचऱ्याची समस्या हाताळण्यात आलेल्या अपयशावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेत राजकारण पेटले आहे. महापौर

मुरलीधर भवार/लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कचऱ्याची समस्या हाताळण्यात आलेल्या अपयशावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेत राजकारण पेटले आहे. महापौर राजेंद्र देवळेकर व आयुक्त ई. रवींद्रन यांनी अस्वच्छ शहरांकरिता जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी केली. कचऱ्याच्या समस्येवर मात करण्याकरिता तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे आदेश महापौर देवळेकर यांनी आयुक्त रवींद्रन यांना दिले.स्वच्छ शहरांच्या यादीत झालेल्या घसरणीची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौर देवळेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, तर आयुक्त रवींद्रन यांची तत्काळ बदली करून त्यांच्याजागी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते मनसेचे प्रकाश भोईर यांनी केली. महापौर देवळेकर म्हणाले की, स्वच्छ शहरांच्या यादीत घसरण झाली, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कोणतेही काम अंतिम टप्प्यात आल्यावर त्यासाठी पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याची स्टंटबाजी करणाऱ्या मनसेला माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारच नाही. आधारवाडी प्रकल्प वेळेत सुरू होऊ शकला नाही, त्याचा फटका बसला आहे. मात्र, आता तेथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्याकरिता कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. महिनाभरात कामाला सुरुवात होईल. कचरा वर्गीकरणात लोकसहभागाचे प्रयत्न केले जाणार आहेत. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती सक्षम आहे. मनसेने नाक खुपसून हस्तक्षेप करू नये, असा टोला महापौरांनी लगावला. याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले म्हणाले की, ‘करावे तसे भरावे’ या उक्तीप्रमाणे महापालिकेची जोरदार घसरण झालेली आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महापालिकांचा वविशेषत: नगरपालिकांचा क्रमांक कल्याण-डोंबिवलीच्याही पुढे गेला आहे, हे पालिकेचे अपयश आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड ज्या नगरसेवकाच्या प्रभागात येते, ते शिवसेना नगरसेवक मोहन उगले म्हणाले, महापालिका प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत पूर्णत: अपयशी ठरले आहे, हे आम्ही लोकप्रतिनिधी सतत बोलत होतो. ते सर्वेक्षणावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणण्याला आता प्रशासनाला वाव वाही. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी कामावर न येताच त्यांची हजेरी कशी काय लागते? घनकचरा विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी शहरांची संख्या पाहता आताच्या सर्वेक्षणात महापालिकेचा नंबर ५० टक्क्यांच्याही आत असल्याचा दावा केला. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याच्या कामाला जून महिन्यात सुरुवात होईल. बारावे, उंबर्डे भरावभूमी क्षेत्र सुरू करण्याचे काम डिसेंबरअखेरपर्यंत होईल. हे सगळे झाल्यावर अस्वच्छ शहराचा डाग पुसून काढण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला.कचराप्रश्नी उपाययोजनेसाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश महापौर देवळेकर यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. पालिकेने ‘माझी डोंबिवली, माझं कल्याण’ हे अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांंनी केल्या. ज्या सोसायट्या स्वत:हून कचऱ्याची विल्हेवाट लावतील, त्यातील रहिवाशांना मालमत्ताकरात सूट देण्याचे आदेश त्यांनी दिले. इमारतीचे साहित्य उचलण्याकरिता लवकरच टोल फ्री क्रमांक जाहीर केला जाईल.