शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

स्वखर्चातून कचराप्रक्रिया प्रकल्प; वास्तुविशारदाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:42 IST

पर्यावरण दिन विशेष : दोन यंत्रे आजपासून होणार सुरू

मुरलीधर भवार कल्याण : पर्यावरणाचा समतोल राखणारी घरे निर्माण करणाऱ्या वास्तुविशारदाने इको-फ्रेण्डली अर्थात ग्रीन सोसायटी तयार केली आहे. त्यांनी या सोसायटीत स्वखर्चातून वापरलेला नारळ, प्लास्टीक, काचा यांसारख्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी पर्यावरणदिनी दोन संयंत्रे सुरू करण्यात येणार असून नारळाच्या कचºयापासून भुसा, काचेवर प्रक्रिया करून रांगोळी, भाजीपाला व तत्सम कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि प्लास्टीकवरील प्रकिया करून ते रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या मानपाडा येथून संदप गावाकडे जाणाºया रस्त्यालगत पॅरामाउंट पार्क ही ग्रीन सोसायटी आहे.

सोसायटीच्या आवारात झाडे असून जमिनीत पाणी मुरावे यासाठी पेव्हरब्लॉक लावण्यात आलेले नाहीत. तसेच, गॅलेरीमध्ये बाग असून वर्षा जलसंचयन प्रकल्प राबवण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पही सोसायटीच्या मालकाचा आहे. वास्तुविशारद दिलीप देशमुख यांनी ग्रीन सोसायटीची संकल्पना राबवली आहे. पर्यावरणपूरक घरे या विषयात त्यांनी वास्तुविशारदाचे शिक्षण घेतले आहे. इगतपुरीनजीक एका आदिवासी गावात एक हजारापेक्षा जास्त झाडे त्यांनी लावली आहेत. तसेच, प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांनी बॅटरीवर चालणाºया दोन गाड्या घेतल्या आहेत. आता त्यांनी कचºयाच्या विल्हेवाटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा त्यांचा छंद ते स्वखर्चातून जोपासत आहेत.

शहरातील नारळपाणी, भाजीपाला विक्रेत्यांकडील कचरा, फेकलेल्या काचेच्या बाटल्या यावर प्रक्रिया करणारे यंत्र त्यांनी खरेदी केले आहे. त्यासाठी महिनाभरापासून त्यांनी विघटनशील आणि पुनर्प्रक्रियायोग्य कचरा गोळा केला आहे. त्यासाठी दोन यंत्रे कार्यान्वित करणार असून त्यासाठी स्वत:च्या खिशातून दहा लाख खर्च करणार आहेत. नारळाच्या कचºयापासून भुसा बनवून त्याचा सरपण म्हणून वापर करता येणार आहे. काचेपासून रांगोळी, तर प्लास्टीकवर प्रक्रिया करून त्याचा रस्तेकामात उपयोग करता येणार आहे. भाजीपाला व ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सोसायटीच्या एक पिकअप व्हॅनला दुपारी १ ते रात्री दहा वाजता वाहतूक कमी असताना कचरा गोळा करण्याची परवानगी महापालिकेने द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे देशमुख यांनी केली आहे. त्यांच्याकडून प्रक्रिया केंद्राचे यंत्र उद्या पर्यावरण दिनानिमित्त कार्यान्वित केले जाणार आहे.

काय होणार फायदे

  • कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाण्याचे प्रमाण कमी होईल.
  • कचऱ्याचा डोंगर वाढणार नाही.
  • डम्पिंगच्या दुर्गंधीपासून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून सुटका होईल.
  • मिथेन वायू निर्मिती थांबून पर्यावरण संरक्षण होईल.
  • कचरा वाहतूक गाड्यांची संख्या कमी झाल्यास वाहतूककोंडी होणार नाही.
  • कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर करावा लागणारा खर्च कमी होईल.
  • पर्यावरणाचे संतुलन राहण्यास मदत होईल.