शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

स्वखर्चातून कचराप्रक्रिया प्रकल्प; वास्तुविशारदाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:42 IST

पर्यावरण दिन विशेष : दोन यंत्रे आजपासून होणार सुरू

मुरलीधर भवार कल्याण : पर्यावरणाचा समतोल राखणारी घरे निर्माण करणाऱ्या वास्तुविशारदाने इको-फ्रेण्डली अर्थात ग्रीन सोसायटी तयार केली आहे. त्यांनी या सोसायटीत स्वखर्चातून वापरलेला नारळ, प्लास्टीक, काचा यांसारख्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी पर्यावरणदिनी दोन संयंत्रे सुरू करण्यात येणार असून नारळाच्या कचºयापासून भुसा, काचेवर प्रक्रिया करून रांगोळी, भाजीपाला व तत्सम कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि प्लास्टीकवरील प्रकिया करून ते रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या मानपाडा येथून संदप गावाकडे जाणाºया रस्त्यालगत पॅरामाउंट पार्क ही ग्रीन सोसायटी आहे.

सोसायटीच्या आवारात झाडे असून जमिनीत पाणी मुरावे यासाठी पेव्हरब्लॉक लावण्यात आलेले नाहीत. तसेच, गॅलेरीमध्ये बाग असून वर्षा जलसंचयन प्रकल्प राबवण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पही सोसायटीच्या मालकाचा आहे. वास्तुविशारद दिलीप देशमुख यांनी ग्रीन सोसायटीची संकल्पना राबवली आहे. पर्यावरणपूरक घरे या विषयात त्यांनी वास्तुविशारदाचे शिक्षण घेतले आहे. इगतपुरीनजीक एका आदिवासी गावात एक हजारापेक्षा जास्त झाडे त्यांनी लावली आहेत. तसेच, प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांनी बॅटरीवर चालणाºया दोन गाड्या घेतल्या आहेत. आता त्यांनी कचºयाच्या विल्हेवाटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा त्यांचा छंद ते स्वखर्चातून जोपासत आहेत.

शहरातील नारळपाणी, भाजीपाला विक्रेत्यांकडील कचरा, फेकलेल्या काचेच्या बाटल्या यावर प्रक्रिया करणारे यंत्र त्यांनी खरेदी केले आहे. त्यासाठी महिनाभरापासून त्यांनी विघटनशील आणि पुनर्प्रक्रियायोग्य कचरा गोळा केला आहे. त्यासाठी दोन यंत्रे कार्यान्वित करणार असून त्यासाठी स्वत:च्या खिशातून दहा लाख खर्च करणार आहेत. नारळाच्या कचºयापासून भुसा बनवून त्याचा सरपण म्हणून वापर करता येणार आहे. काचेपासून रांगोळी, तर प्लास्टीकवर प्रक्रिया करून त्याचा रस्तेकामात उपयोग करता येणार आहे. भाजीपाला व ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सोसायटीच्या एक पिकअप व्हॅनला दुपारी १ ते रात्री दहा वाजता वाहतूक कमी असताना कचरा गोळा करण्याची परवानगी महापालिकेने द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे देशमुख यांनी केली आहे. त्यांच्याकडून प्रक्रिया केंद्राचे यंत्र उद्या पर्यावरण दिनानिमित्त कार्यान्वित केले जाणार आहे.

काय होणार फायदे

  • कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाण्याचे प्रमाण कमी होईल.
  • कचऱ्याचा डोंगर वाढणार नाही.
  • डम्पिंगच्या दुर्गंधीपासून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून सुटका होईल.
  • मिथेन वायू निर्मिती थांबून पर्यावरण संरक्षण होईल.
  • कचरा वाहतूक गाड्यांची संख्या कमी झाल्यास वाहतूककोंडी होणार नाही.
  • कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर करावा लागणारा खर्च कमी होईल.
  • पर्यावरणाचे संतुलन राहण्यास मदत होईल.