शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

प्रभाग प्रारूप मतदार यादीचा पत्ताच नाही

By admin | Updated: June 29, 2017 02:38 IST

मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश असताना अद्याप महापालिकेने मतदारांची प्रारुप यादीच प्रसिध्द केली नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेने प्रारुप यादीच प्रसिध्द न केल्याने त्यावर हरकती, सूचना घेण्याची मुदत कमी होणार आहे. मीरा- भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १३ जून रोजी प्रसिध्द झालेल्या विधानसभा मतदारयादीचा वापर महापालिका निवडणुकीसाठी करण्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. आयोगाने दोन जून रोजी आदेश काढून ५ जानेवारी ते १३ जून दरम्यान मतदारनोंदणी अधिकारी यांनी दाखल केलेली नवीन नावे व दुरुस्त्या महापालिकेने प्राप्त करून मतदारांचे प्रभागानुसार विभाजन करण्यास आयोगाने सांगितले हते. मीरा- भार्इंदर महापालिकेला प्रभाग निहाय प्रारूप यादी २५ जून रोजी प्रसिध्द करण्यास सांगितले होते. तर ७ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यावर २५ जून ते १ जुलैपर्यंत हरकती व सूचना द्यायच्या आहेत. हरकती वा सूचनांमध्ये केवळ लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा चुकून झालेला समावेश तसेच विधानसभा मतदारयादीत नाव असताना प्रभागाच्या यादीत वगळले असल्यास त्याचा समावेश करुन घेणे या दुरुस्त्या करता येणार आहेत. मुदत उलटून दोन दिवस उलटले तरी मीरा- भार्इंदर महापालिकेने अद्यापही प्रारूप यादीच जाहीर केलेली नाही. वास्तविक महापालिकेने आयोगाच्या आदेशानुसार २५ जून रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय व अन्य कार्यालयांमधील सूचनाफलकांवर तसेच पालिकेचे संकेतस्थळ, वृत्तपत्र व केबलवाहिनीवर प्रसिध्द करणे आवश्यक होते. पण २६ जून होऊनही अजून महापालिकेने प्रारूप यादीच प्रसिध्द केलेली नाही. पालिकेच्या या सावळ्यागोंधळामुळे निवडणूक आयोगाचे आदेश केराच्या टोपलीत गेले आहेत. शिवाय मतदारयादीबाबत हरकती, सूचना घेण्याची मुदत १ जुलै पर्यंत असली तरी यादीच प्रसिध्द न झाल्याने प्रारूपयादीत नव्याने दाखल नावे, दुरूस्त्या यांची काटेकोर छाननी करण्यास इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांना कमी दिवस मिळणार आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सुमारे ५० हजार नवीन नावे मतदारयादीत नोंदवण्यात आली आहेत.