शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता - सहस्त्रबुद्धे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 31, 2024 17:40 IST

मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी हे मत व्यक्त केले. 

ठाणे : आतापर्यंत भारतात १७ पैकी ९ वेळा ६० किंवा त्यापेक्षा अधिक मतदान झालेले आहे. ६० आणि त्यापेक्षा जास्त मतदान झाले त्या त्यावेळी बदल घडला आहे. २०१९ साली ६७ टक्क्यांच्यावर मतदान झाले होते. १९५२ ते २०१९ या कालावधीत मतदानाचे प्रमाण वाढले. जेव्हा मतदार मतदानासाठी जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा उत्साह जास्त वाढतो. कदाचित लोकसभेच्या निवडणूकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी मत व्यक्त केले. 

इंद्रधनु आयोजित "बदलता भारत" मालिकेतील "निवडणुका"या विषयावरील पुष्प शनिवारी सहयोग मंदिर सभागृहात गुंफले गेले. या चर्चासत्रात डॉ. सहस्रबुद्धे आणि ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांच्याशी पत्रकार भारती सहस्रबुद्धे यांनी संवाद साधला. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, सगळ्यात कमी मतदान म्हणजेच ४४ टक्के मतदान १९५२ च्या काळात झाले होते. आजपर्यंत सगळ्यात कमी झालेले ते मतदान होते. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढतच गेला. ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे म्हणाले की, मतदानाची संरचना गेल्या १५ ते २० वर्षांत प्रेसिडेन्शीयल मतदानाप्रमाणे केली आहे आणि हे माध्यमांनी केलेले पाप आहे. आपली द्विपक्षी लोकशाही नाही. माध्यमे समाजात आपल्या निवडणूकीतील मतदानाची रचना ही अमेरिकेतील मतदानाप्रमाणे प्रेक्षकांसमोर आणत आहेत. अशामुळे आपण मतदानापासून दूर जात आहोत. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, नोटा हा पर्याय दिला ती चांगली गोष्ट आहे. पण नोटाची मते जर पहिल्या क्रमांकावर आली तर त्या भागातील निवडणूक बंद करावी किंवा त्या उमेदरावाला परत निवडणूकीत उभे राहण्यापासून रोखावे. मतदानाचा टक्का वाढतोय म्हणजे मतदार मतदानाविषयी गंभीर आहेत. ईव्हीएमवर विश्वास म्हणून मतदार मतदानासाठी येतात. हरल्यावर इव्हीएमवर अविश्वास दाखवायचा आणि जिंकल्यावर त्याविषयी काही बोलायचे नाही असे वातावरण असल्याने इव्हीएमवरील अविश्वासाला गांभीर्याने घेतले जात नाहीत.

टॅग्स :thaneठाणे