शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता - सहस्त्रबुद्धे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 31, 2024 17:40 IST

मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी हे मत व्यक्त केले. 

ठाणे : आतापर्यंत भारतात १७ पैकी ९ वेळा ६० किंवा त्यापेक्षा अधिक मतदान झालेले आहे. ६० आणि त्यापेक्षा जास्त मतदान झाले त्या त्यावेळी बदल घडला आहे. २०१९ साली ६७ टक्क्यांच्यावर मतदान झाले होते. १९५२ ते २०१९ या कालावधीत मतदानाचे प्रमाण वाढले. जेव्हा मतदार मतदानासाठी जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा उत्साह जास्त वाढतो. कदाचित लोकसभेच्या निवडणूकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी मत व्यक्त केले. 

इंद्रधनु आयोजित "बदलता भारत" मालिकेतील "निवडणुका"या विषयावरील पुष्प शनिवारी सहयोग मंदिर सभागृहात गुंफले गेले. या चर्चासत्रात डॉ. सहस्रबुद्धे आणि ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांच्याशी पत्रकार भारती सहस्रबुद्धे यांनी संवाद साधला. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, सगळ्यात कमी मतदान म्हणजेच ४४ टक्के मतदान १९५२ च्या काळात झाले होते. आजपर्यंत सगळ्यात कमी झालेले ते मतदान होते. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढतच गेला. ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे म्हणाले की, मतदानाची संरचना गेल्या १५ ते २० वर्षांत प्रेसिडेन्शीयल मतदानाप्रमाणे केली आहे आणि हे माध्यमांनी केलेले पाप आहे. आपली द्विपक्षी लोकशाही नाही. माध्यमे समाजात आपल्या निवडणूकीतील मतदानाची रचना ही अमेरिकेतील मतदानाप्रमाणे प्रेक्षकांसमोर आणत आहेत. अशामुळे आपण मतदानापासून दूर जात आहोत. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, नोटा हा पर्याय दिला ती चांगली गोष्ट आहे. पण नोटाची मते जर पहिल्या क्रमांकावर आली तर त्या भागातील निवडणूक बंद करावी किंवा त्या उमेदरावाला परत निवडणूकीत उभे राहण्यापासून रोखावे. मतदानाचा टक्का वाढतोय म्हणजे मतदार मतदानाविषयी गंभीर आहेत. ईव्हीएमवर विश्वास म्हणून मतदार मतदानासाठी येतात. हरल्यावर इव्हीएमवर अविश्वास दाखवायचा आणि जिंकल्यावर त्याविषयी काही बोलायचे नाही असे वातावरण असल्याने इव्हीएमवरील अविश्वासाला गांभीर्याने घेतले जात नाहीत.

टॅग्स :thaneठाणे