शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता - सहस्त्रबुद्धे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 31, 2024 17:40 IST

मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी हे मत व्यक्त केले. 

ठाणे : आतापर्यंत भारतात १७ पैकी ९ वेळा ६० किंवा त्यापेक्षा अधिक मतदान झालेले आहे. ६० आणि त्यापेक्षा जास्त मतदान झाले त्या त्यावेळी बदल घडला आहे. २०१९ साली ६७ टक्क्यांच्यावर मतदान झाले होते. १९५२ ते २०१९ या कालावधीत मतदानाचे प्रमाण वाढले. जेव्हा मतदार मतदानासाठी जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा उत्साह जास्त वाढतो. कदाचित लोकसभेच्या निवडणूकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी मत व्यक्त केले. 

इंद्रधनु आयोजित "बदलता भारत" मालिकेतील "निवडणुका"या विषयावरील पुष्प शनिवारी सहयोग मंदिर सभागृहात गुंफले गेले. या चर्चासत्रात डॉ. सहस्रबुद्धे आणि ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांच्याशी पत्रकार भारती सहस्रबुद्धे यांनी संवाद साधला. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, सगळ्यात कमी मतदान म्हणजेच ४४ टक्के मतदान १९५२ च्या काळात झाले होते. आजपर्यंत सगळ्यात कमी झालेले ते मतदान होते. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढतच गेला. ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे म्हणाले की, मतदानाची संरचना गेल्या १५ ते २० वर्षांत प्रेसिडेन्शीयल मतदानाप्रमाणे केली आहे आणि हे माध्यमांनी केलेले पाप आहे. आपली द्विपक्षी लोकशाही नाही. माध्यमे समाजात आपल्या निवडणूकीतील मतदानाची रचना ही अमेरिकेतील मतदानाप्रमाणे प्रेक्षकांसमोर आणत आहेत. अशामुळे आपण मतदानापासून दूर जात आहोत. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, नोटा हा पर्याय दिला ती चांगली गोष्ट आहे. पण नोटाची मते जर पहिल्या क्रमांकावर आली तर त्या भागातील निवडणूक बंद करावी किंवा त्या उमेदरावाला परत निवडणूकीत उभे राहण्यापासून रोखावे. मतदानाचा टक्का वाढतोय म्हणजे मतदार मतदानाविषयी गंभीर आहेत. ईव्हीएमवर विश्वास म्हणून मतदार मतदानासाठी येतात. हरल्यावर इव्हीएमवर अविश्वास दाखवायचा आणि जिंकल्यावर त्याविषयी काही बोलायचे नाही असे वातावरण असल्याने इव्हीएमवरील अविश्वासाला गांभीर्याने घेतले जात नाहीत.

टॅग्स :thaneठाणे