शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाडा येथे श्रमजीवीचा विराट मोर्चा

By admin | Updated: December 22, 2015 00:14 IST

महागाई, कुपोषण व ‘त्या’ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज वाडा तहसिलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले.

वाडा : महागाई, कुपोषण व ‘त्या’ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज वाडा तहसिलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले.या मोचार्चे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, सहसरचिटणीस विजय जाधव यांनी केले.कहा गये अच्छे दिन ; वापस लाओ पुराने दिन, मंत्री खातो तुपाशी ; आदिवासी मुलं उपाशी, पोषण आहार मिळालाच पाहिजे ; मिळालाच पाहिजे, भाजपच्या गुंडांना अटक करा; अटक करा, सवरा मंत्री कोणाचा ; दलालांचा ठेकेदारांचा, खाली करा खाली करा; सवरा खुर्ची खाली करा अशा घोषणा मोर्चा दरम्यान देण्यात आल्या.देसई नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत फिरून तिचे रुपांतर तहसिलदार कार्यालयासमोर मोर्चात झाले. यावेळी मोर्चात कांदा, लसूण व सकस आहार योजने अंतर्गत भरलेले जेवणाचे ताट प्रतिकात्मक स्वरूपात तहसिलदारांना देण्यात आले. २५ रूपयांत सकस आहार देणे शक्य नसताना अशी फसवी योजना कार्यान्वित करणाऱ्या सरकारचा यावेळी निषेध केला. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, ४ डिसेंबर २०१५ रोजी उद्घाटन केलेली अमृत आहार योजना प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली नसून आजपर्यंत एकाही तालुक्यात निधी उपलब्ध झाला नसून योजना फक्त कागदावर आहे. या योजनेमुळे आधीच कुपोषित म्हणून जन्मलेल्या मुलांचे कुपोषण कसे दूर होणार याबाबत स्पष्टीकरण द्यावे. व्ही. सी. डी. सी. बंद करून सरकारने त्याला पर्यायी योजना दिलेली नाही. आणि अमृत आहार योजना हा त्याचा पर्याय नाही म्हणूनच कुपोषित मुलांच्या विशेष आहारासाठी व्ही. सी. डी सी. योजना पुन्हा सुरू करावी या मागण्या होत्या. या मोचार्ला श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर, केशव नानकर, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, सरिता जाधव, लक्ष्मण पडवले, जया पारधी, दशरथ बालके, भगवान मते, आदींनी भाषणात सवरा यांच्या वर टीका केली.