शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मनाई आदेशाचे उल्लंघन, ८१ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST

कल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पोलीस आणि केडीएमसी प्रशासन आक्रमक झाले आहे. मागील दोन दिवसांत मनपा क्षेत्रात ...

कल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पोलीस आणि केडीएमसी प्रशासन आक्रमक झाले आहे. मागील दोन दिवसांत मनपा क्षेत्रात मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, याबरोबरच ठरावीक वेळेत दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतानाही त्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

दुकाने उशिरापर्यंत उघडी ठेवणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या प्रकरणी बुधवारी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात १०, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात १, मानपाडा पोलीस ठाण्यात ३, रामनगर पोलिसात १४, विष्णूनगरमध्ये आठ, अशा एकूण ३६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तर विहित वेळेत दुकाने बंद न करून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बाजारपेठ पोलीस ठाण्यात १५, खडकपाडा पोलीस ठाण्यात आठ, अशा २३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. गुरुवारी झालेल्या कारवाईत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चार, मानपाडा पोलीस ठाण्यात एक, विष्णूनगर पोलीस ठाण्यात एक, अशा सहा गुन्ह्यांची नोंद झाली. तर, निर्बंध घालूनही वेळेत दुकाने बंद न करून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बाजारपेठ पोलिसात दोन, कोळसेवाडी पोलिसात १३, खडकपाडा पोलिसात एक, अशा १६ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

-------------------