शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

वरसावे पुलाला पुन्हा तडे; पुढील आठवडयात दुरुस्तीला सुरुवात

By admin | Updated: September 29, 2016 22:53 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या गर्डरला पुन्हा तडे गेल्याचे नुकत्याच पूर्ण झालेल्या स्ट्रक्टरल ऑडीटमुळे निदर्शनास आले आहे

राजू काळे भाईंदर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या गर्डरला पुन्हा तडे गेल्याचे नुकत्याच पूर्ण झालेल्या स्ट्रक्टरल ऑडीटमुळे निदर्शनास आले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी हा पुल पुढील आठवडयात वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सध्या या पुलावरून पुढील धोका टाळण्यासाठी केवळ हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. तर बाजूच्या पुलावरून अवजड वाहने प्रत्येकी 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने सोडली जात आहेत. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून तिच्या नियोजनासाठी पालघर व ठाणे ग्रामीण वाहतूक व स्थानिक पोलीस कर्मचारी, अधिकारी 24 तास तैनात करण्यात आले आहेत. गेल्या 33 वर्षांत पुलाची तिसऱ्यांदा दुरुस्ती करण्यात येत आहे. 2013 मध्ये देखील पुलाच्या गर्डरला तडा गेल्याने तब्बल दिड वर्षे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनांना त्यातून बाहेर पाडण्यासाठी तब्बल 2 ते 3 तासांचा विलंब लागत होता. यानंतर पुलाच्या दुरुस्तीचा मुद्दा ऑगस्टमध्ये महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे उपस्थितीत झाला. त्याचे वृत्त प्रथम लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर 3 सेप्टेंबरला भारतीय राष्ट्रीय महामार्गीय प्राधिकरणाने (एनएचएआय) आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांधकाम तज्ञ डॉ. रैना यांच्या नेतृत्वाखालील पथकामार्फत पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात केली. ती 22 सप्टेंबरला पूर्ण करण्यात आली.

तपासणी दरम्यान पुलाच्या वरसावे बाजूकडील चौथ्या क्रमांकाच्या 114 मीटर लांबीच्या गर्डरला एकूण तीन तडे गेल्याचे आढळून आले. यात एक तडा मोठा असून उर्वरित लहान स्वरूपाचे तडे आहेत. सध्या त्याची दुरुस्ती कशा प्रकारे करायची त्याची आखणी पथकाद्वारे केली जात आहे. त्यांच्याकडून पद्धतशीर दुरुस्तीचे निर्देश आल्यानंतर दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचा अंतिम अहवाल या आठवड्यात एनएचएआयला प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात त्याच्या दुरुस्तीला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. त्यावेळी मात्र पुलावर सध्या सुरु असलेली हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या दुरुस्तीला किमान 15 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता एनएचएआयकडून वर्तविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी मोठा विलंब लागण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

पुलाच्या दुरुस्तीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील दापचारी, नाशिकरोड, वाडा-भिवंडी रोड आदी ठिकाणी अवजड वाहने टप्या-टप्याने गुजरात व मुंबईच्या दिशेने सोडण्यासाठी वाहनतळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडीचे काही प्रमाणात नियोजन होऊन त्याचा ताण सुसह्य होणार आहे. यावर पालकमंत्र्यांकडून थेट नियंत्रण ठेवले जात असून दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले आहे.