शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पुलाला पुन्हा तडे; पुढील आठवडयात दुरुस्तीला सुरुवात

By admin | Updated: September 29, 2016 22:53 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या गर्डरला पुन्हा तडे गेल्याचे नुकत्याच पूर्ण झालेल्या स्ट्रक्टरल ऑडीटमुळे निदर्शनास आले आहे

राजू काळे भाईंदर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या गर्डरला पुन्हा तडे गेल्याचे नुकत्याच पूर्ण झालेल्या स्ट्रक्टरल ऑडीटमुळे निदर्शनास आले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी हा पुल पुढील आठवडयात वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सध्या या पुलावरून पुढील धोका टाळण्यासाठी केवळ हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. तर बाजूच्या पुलावरून अवजड वाहने प्रत्येकी 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने सोडली जात आहेत. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून तिच्या नियोजनासाठी पालघर व ठाणे ग्रामीण वाहतूक व स्थानिक पोलीस कर्मचारी, अधिकारी 24 तास तैनात करण्यात आले आहेत. गेल्या 33 वर्षांत पुलाची तिसऱ्यांदा दुरुस्ती करण्यात येत आहे. 2013 मध्ये देखील पुलाच्या गर्डरला तडा गेल्याने तब्बल दिड वर्षे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनांना त्यातून बाहेर पाडण्यासाठी तब्बल 2 ते 3 तासांचा विलंब लागत होता. यानंतर पुलाच्या दुरुस्तीचा मुद्दा ऑगस्टमध्ये महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे उपस्थितीत झाला. त्याचे वृत्त प्रथम लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर 3 सेप्टेंबरला भारतीय राष्ट्रीय महामार्गीय प्राधिकरणाने (एनएचएआय) आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांधकाम तज्ञ डॉ. रैना यांच्या नेतृत्वाखालील पथकामार्फत पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात केली. ती 22 सप्टेंबरला पूर्ण करण्यात आली.

तपासणी दरम्यान पुलाच्या वरसावे बाजूकडील चौथ्या क्रमांकाच्या 114 मीटर लांबीच्या गर्डरला एकूण तीन तडे गेल्याचे आढळून आले. यात एक तडा मोठा असून उर्वरित लहान स्वरूपाचे तडे आहेत. सध्या त्याची दुरुस्ती कशा प्रकारे करायची त्याची आखणी पथकाद्वारे केली जात आहे. त्यांच्याकडून पद्धतशीर दुरुस्तीचे निर्देश आल्यानंतर दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचा अंतिम अहवाल या आठवड्यात एनएचएआयला प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात त्याच्या दुरुस्तीला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. त्यावेळी मात्र पुलावर सध्या सुरु असलेली हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या दुरुस्तीला किमान 15 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता एनएचएआयकडून वर्तविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी मोठा विलंब लागण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

पुलाच्या दुरुस्तीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील दापचारी, नाशिकरोड, वाडा-भिवंडी रोड आदी ठिकाणी अवजड वाहने टप्या-टप्याने गुजरात व मुंबईच्या दिशेने सोडण्यासाठी वाहनतळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडीचे काही प्रमाणात नियोजन होऊन त्याचा ताण सुसह्य होणार आहे. यावर पालकमंत्र्यांकडून थेट नियंत्रण ठेवले जात असून दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले आहे.