शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

बदलापूर पालिकेची भाजी मंडई धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:30 IST

विक्रेत्यांची पाठ : लाखोंचा निधी गेला वाया

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वतीने ११ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली भाजी मंडई सध्या धूळखात आहे. मुख्य बाजारपेठ आणि स्थानकापासून दूर असल्याने विक्रेत्यांनी या मंडईकडे पाठ फिरवली आहे. ज्या विक्रेत्यांनी या मंडईत रस दाखवला आहे, त्यांनीही ग्राहकांअभावी येथील दावा सोडला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेला.

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या पूर्वीच्या मुख्यालयाजवळ फळे आणि भाजी मंडईची इमारत नगरपालिकेने उभारली होती. तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते आॅगस्ट २०११ मध्ये मंडईचे लोकार्पण झाले होते. या इमारतीत तळ मजल्यावर ३५ चौरस फूट आकाराचे ३९ गाळे आहेत. तर, पहिल्या मजल्यावर दोन हजार ९२२ फुटांचे सभागृह आहे. या मंडईतील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी पालिकेच्या वतीने निविदा मागवल्या होत्या. मात्र, २०११ च्या अखेरपर्यंत या निविदेवर प्रक्रि या झाली नव्हती. तत्कालीन कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीही या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरून लवकरात लवकर ही मंडई सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही काळ मंडईची प्रक्रि या ठप्प झाली होती.

काही विक्रेत्यांनी येथील दुकानांचा ताबाही घेतला. मात्र स्थानक परिसरात, नवरत्न हॉटेलपुढे फेरीवाले बसत असल्याने ग्राहकही मंडईत जाणे टाळत होते. भाजीविक्र ी होत नसल्याने अखेर विक्रेत्यांनीही भरलेले पैसे परत घेत येथील दुकानांवरील दावे सोडले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ही भाजी मंडई धूळखात आहे.

भाजी मंडई सुरू करत असताना रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज होती. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने मंडईत भाजीखरेदीसाठी नागरिक येत नाहीत. पालिकेच्या चुकीच्या नियोजनाचा फटका मंडईला बसला आहे.

तत्कालीन प्रशासनाने गाळ्यांचे वाटपही केले होते. ग्राहक येत नसल्याने त्यांनी गाळे सोडले. विक्रेत्यांना यात रस नसल्याने याचा दुसरा वापर करता येईल का, याचा लवकरच विचार केला जाईल. - प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी