शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी समिती काढणार वसईत इशारा मोर्चा

By admin | Updated: January 25, 2017 04:31 IST

वसईच्या ग्रामीण भागात एसटीशिवाय पर्याय नसल्याने शहर बससेवा अखंडीतपणे सुरुच राहावी व त्याचबरोबर २९ गावे महापालिकेतून वगळण्यासाठी

शशी करपे / वसईवसईच्या ग्रामीण भागात एसटीशिवाय पर्याय नसल्याने शहर बससेवा अखंडीतपणे सुरुच राहावी व त्याचबरोबर २९ गावे महापालिकेतून वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोर्टात बाजू मांडावी या मागण्यांसाठी २६ जानेवारीला तहसिल कचेरीवर मोर्चा नेण्यात येणार आहे. वसई विरार महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेली जनआंदोलन समिती एसटी बचावचा नारा देत वसईच्या राजकारणात पुन्हा सक्रीय होतांना दिसते आहे. जनआंदोलन समितीने केलेल्या आंदोलनांमुळेच विवेक पंडित आमदार झाले होते. तर वसई विरार महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत समितीचे २१ नगरसेवक निवडून आले होते. इतकेच नाही तर जनआंदोलन समितीने वसई पंचायत समितीची सत्ता खेचून आणून जिल्हा परिषदेच्या सत्तेतही सहभाग घेतला होता. मात्र, अवघ्या पाच वर्षात जनआंदोलनाची धार बोथट झाली होती. जनआंदोलन समितीतून सर्वपक्षीय नेते बाहेर पडले होते. त्यानंतर समितीला ग्रहण लागले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत विवेक पंडित पराभूत झाले. त्यानंतर पंडितांनी वसईच्या राजकारणापासून फारकत घेत अलिप्त राहणेच पसंत केले होते. परिणामी वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत समितीने सपाटून मार खाल्ला होता. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही समितीचा दारूण पराभव झाला होता. एकूणच वसईच्या राजकीय क्षितिजावरून जनआंदोलन समिती अस्तंगत झाली होती. जनआंदोलन समितीचे अस्तित्व टिकण्यासाठी डॉमणिका डाबरे, मिलिंंद खानोलकर, प्रफुल्ल ठाकूर, शाम पाटकर, सुनिल डिसिल्वा यांच्यासह काही मोजकेच चेहरे अजून धडपड करीत आहेत. एसटीच्या निमित्ताने समितीला संजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाने १ जानेवारीपासून वसईतील एसटीची शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी समितीने केलेल्या आंदोलनाला वसईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. हाच धागा पकडून समितीने आंदोलनाच्या निमित्ताने वसईच्या पश्चिम पट्ट्यात पाय रोवण्याचा प्रयत्न सुुरु केला आहे. एसटी बचावचा नारा देत समितीने गावागावात बैठका घेतल्या होत्या. त्याला गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. एसटीसाठी गावकरी रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे लक्षात आलेल्या समितीने वसईत एसटी कायमस्वरुपी सुरु रहावी यासाठी वसई तहसिल कचेररीवर २६ जानेवारीला मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा दुपारी ३ वाजता चिमाजी आप्पा मैदानावरून निघणार आहे. पहाटे ३.३० वाजता निघणारी पहिली आणि रात्री २.३० वाजता जाणारी एसटी १ जानेवारीपासून महामंडळाने अचानक बंद केली. त्यामुळे मुंबईला दुध, भाजीपाला विकण्यासाठी जाणारे शेतकरी, विद्यार्थी, चाकरमानी यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.महापालिकेने त्यांची परिवहन सेवा सुरु केल्याचे कारण यावेळी महामंडळाने दिले होते.मात्र,महापालिकेची पहिली बस सकाळी सात वाजता सुरु होवून शेवटची बस रात्री ९ वाजता सुटते. त्यामुळे परिवहन सेवेचे दिलेले कारण खोटे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेवून पहाटे पाच वाजता नालासोपारा डेपोत ठिय्या मांडून सर्व एसट्या अडवून धरल्या.ऐन परिक्षेच्या तोंडावर ही सेवा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी ३१ मार्चपर्यंत सेवा सुरु ठेऊन महामंडळाने ग्रामस्थांना दिलासा दिला.