शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई-परिचारिकांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा दिवसरात्र राबत आहेत. यामध्ये ...

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा दिवसरात्र राबत आहेत. यामध्ये आरोग्य विभाग हा आघाडीवर आहे. असे असतानाही ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तर शिपाई आणि परिचारिका (नर्स) नसल्याची गंभीर बाब बुधवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उघडकीस आणली. प्रशासनाकडून केवळ शहरीकरण असलेल्या भागात मनुष्यबळ पुरविण्यात येत असून, ग्रामीण भागात ते पुरविण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा बोऱ्हाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. या वेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वाहनचालकांची ४० पदे भरण्यासंदर्भाचा विषय आला होता. त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई आणि परिचारिका नाही अशी गंभीर परस्थिती असल्याचे सांगितले. तसेच कर्मचारी भरती प्रक्रिया राबविताना कुठल्याही प्रकारची समानता दिसून येत नाही. त्यात यापूर्वी वाहनचालकांची भरती प्रक्रिया राबवली त्या वेळीदेखील शहरीकरण भागातच वाहनचालक दिले. त्या वेळी ग्रामीण भागात काही दिले नाही. ग्रामीण भाग दिसत नाही का, असा सवाल त्यांनी विचारला. याच मुद्द्याला हात घालून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत वाहनचालक नसल्याचे सदस्यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेच्या सदस्य मंजुषा जाधव यांनीदेखील कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वाहनचालकाला मागील पाच महिन्यांपासून वेतनच मिळत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तर, कसारा आणि किन्हवली या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी मागील दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही तो मिळाला नसल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी, प्राथमिक आरोग्य केंद्राला सुरक्षारक्षक मिळावेत यासाठीचा पत्रव्यवहार करून मान्यतेसाठी शासन स्तरावर पाठविला असल्याचे सांगितले. तर सदस्य गोकूळ नाईक यांनी आक्रमक होऊन मागील दोन वर्षांपासून हा मुद्दा शासन स्तरावर आहे, असे सांगितले जात आहे. जर सुरक्षारक्षकांचे वेतन जिल्हा परिषद देत असेल तर, त्याला शासनाची मान्यता लागत नसल्याचे सांगून त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.