शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई-परिचारिकांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा दिवसरात्र राबत आहेत. यामध्ये ...

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा दिवसरात्र राबत आहेत. यामध्ये आरोग्य विभाग हा आघाडीवर आहे. असे असतानाही ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तर शिपाई आणि परिचारिका (नर्स) नसल्याची गंभीर बाब बुधवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उघडकीस आणली. प्रशासनाकडून केवळ शहरीकरण असलेल्या भागात मनुष्यबळ पुरविण्यात येत असून, ग्रामीण भागात ते पुरविण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा बोऱ्हाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. या वेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वाहनचालकांची ४० पदे भरण्यासंदर्भाचा विषय आला होता. त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई आणि परिचारिका नाही अशी गंभीर परस्थिती असल्याचे सांगितले. तसेच कर्मचारी भरती प्रक्रिया राबविताना कुठल्याही प्रकारची समानता दिसून येत नाही. त्यात यापूर्वी वाहनचालकांची भरती प्रक्रिया राबवली त्या वेळीदेखील शहरीकरण भागातच वाहनचालक दिले. त्या वेळी ग्रामीण भागात काही दिले नाही. ग्रामीण भाग दिसत नाही का, असा सवाल त्यांनी विचारला. याच मुद्द्याला हात घालून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत वाहनचालक नसल्याचे सदस्यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेच्या सदस्य मंजुषा जाधव यांनीदेखील कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वाहनचालकाला मागील पाच महिन्यांपासून वेतनच मिळत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तर, कसारा आणि किन्हवली या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी मागील दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही तो मिळाला नसल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी, प्राथमिक आरोग्य केंद्राला सुरक्षारक्षक मिळावेत यासाठीचा पत्रव्यवहार करून मान्यतेसाठी शासन स्तरावर पाठविला असल्याचे सांगितले. तर सदस्य गोकूळ नाईक यांनी आक्रमक होऊन मागील दोन वर्षांपासून हा मुद्दा शासन स्तरावर आहे, असे सांगितले जात आहे. जर सुरक्षारक्षकांचे वेतन जिल्हा परिषद देत असेल तर, त्याला शासनाची मान्यता लागत नसल्याचे सांगून त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.