शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

उल्हासनगरची भुयारी गटार योजना मार्गी

By admin | Updated: March 27, 2016 02:21 IST

महापालिकेच्या ४०० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २३३ कोटींचा निधीही सरकारने देऊ केला आहे. या योजनेचा

- सदानंद नाईक,  उल्हासनगर महापालिकेच्या ४०० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २३३ कोटींचा निधीही सरकारने देऊ केला आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे. मान्यता मिळताच निविदा काढून योजनेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. शहरात १९८४ ते १९९३ दरम्यान महाराष्ट्र पाणीपुरवठा मलनि:सारण योजनेंतर्गत पालिकेने भुयारी गटार योजना राबवली. १९९३ मध्ये तीन लाख ६० हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरून २८ दशलक्ष लीटर क्षमतेची भुयार गटार योजना राबवली. आता लोकसंख्या आठ ते नऊ लाखांच्या घरात गेली आहे. ती पुढील दहा वर्षांत आणखी वाढेल.परिणामी, सध्याच्या गटारांची क्षमता संपली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसते. गटारांच्या दुरुस्तीवर पालिकेने दोन कोटी रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.त्यामुळे महापालिकेने नवीन भुयारी गटार योजना आखली. महापालिकेने सुरुवातीला २५४ कोटींची योजना केंद्र सरकारकडे पाठवली. २०२१ मधील १२ लाख लोकसंख्या गृहीत धरून १३५ दक्षलक्ष लीटर क्षमतेची योजना तयार केली आहे. त्यात नव्याने सुधारणा केल्याने २५४ कोटींची योजना आता ४०० कोटींवर गेली आहे. त्यासाठी २३३ कोटी रुपयांच्या निधीला महाराष्ट्र सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवामहापालिका पाणीपुरवठा विभागांतर्गत भुयारी गटार विभाग येतो. या विभागातर्फे गटारांची निगा व दुरुस्ती केली जाते. या विभागाकडे साफसफाईसाठी प्रशिक्षित कर्मचारी व अत्याधुनिक यंत्रसामग्री नाही. त्यामुळे त्यांना खाजगी कंत्राटदारावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच खडेगोळवली येथील बंद पडलेल्या मलनि:सारण केंद्रावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. या प्रकारच्या चौकशीची मागणी वारंवार झाली आहे. मात्र, पालिकेने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.सांडपाणी थेट वालधुनी नदीतमहापालिकेचे २८ दशलक्ष लीटर क्षमतेचे खडेगोळवली येथील मलनि:सारण केंद्र नावालाच सुरू आहे. शहरातील दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट वालधुनी नदीत सोडले जात आहे. शहरातील सांडपाण्यासह जीन्स कारखाने व अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखाने विषारी सांडपाणी सोडत असल्याने वालधुनी नदी प्रदूषित झाली आहे.