शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्ड अंडरग्राऊंड करा

By admin | Updated: March 9, 2017 03:15 IST

ठाण्याचा स्टेशन परिसर आमूलाग्र सुधारणे ही काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्पामुळे काही अंशी वाहतुकीत सुधारणा झाली असली, तरी ती आजच्या घडीला अपुरी आहे.

ठाणे : ठाण्याचा स्टेशन परिसर आमूलाग्र सुधारणे ही काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्पामुळे काही अंशी वाहतुकीत सुधारणा झाली असली, तरी ती आजच्या घडीला अपुरी आहे. तेथील वाहतूक कोंडी फोडाण्यासाठी एकतर तेथील रिक्षा स्टँड, टॅक्सी स्टँड आदी वाहतुकीची पर्यायी साधने परदेशाप्रमाणे अंडरग्राऊंड करण्याची गरज आहे. स्टेशन परिसरातील काही दुकानेही याचपद्धतीने अंडरग्राऊंड केल्यास त्यांनाही चांगली जागा मिळेल आणि स्टेशन परिसरातील कोंडी पुटेल, असे मत ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी मांडले. ठाणे पूर्वेचा सॅटीस प्रकल्प पूर्ण करण्यापूर्वी कोपरी पुलाचे रखडलेले काम आधी मार्गी लागणे गरजेचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. ठाण्यात येणारी मेट्रोही या भागातून वळवल्यास स्टेशन परिसरातील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. ठाण्याच्या अर्थसंकल्पाबाबत अनेक उपयुक्त सूचना करताना ते बोलत होते.स्टेशन परिसरात सुधारणा करण्यासाठी प्रथम हा परिसर हॉकर्स झोन होणे गरजेचे आहे. हा परिसर ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केला असला, तरी तेथे आजही फेरीवाल्यांचे प्रस्थ दिसून येते. त्यामुळे आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास हा परिसर फेरीवालामुक्त होणे हे काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्प झाल्याने येथील वाहतूक कोंडी थोड्या फार प्रमाणात का होईना सुटली आहे. तरीदेखील गोखले रोड, शिवाजी चौक येथील रस्त्यांवर आजही वाहतूक कोंडी होते. त्यामुळे बी कॅबीन भागात रेल्वेची जी काही जागा शिल्लक आहे, त्या जागेचा वापर कशा पध्दतीने करता येऊ शकतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. परदेशात स्टेशन परिसरातील वाहतुकीच्या सुविधा किंवा इतर पूरक सुविधा अंडरग्राऊंड स्वरुपात पुरवल्या जातात. ही बाब खचर््िाक जरी असली, तरी ठाणे स्टेशनचा विस्तार, तेथील गर्दी लक्षात घेऊन या पध्दतीने अंडरग्राऊंड वाहतुकीचा प्रयोग केला, तर मोठ्या प्रमाणात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतील. किंबहुना रिक्षा स्टँड आणि टॅक्सी स्टँडही अंडरग्राऊंड केल्यास ते ही फायदेशीर ठरु शकतील. स्टेशन परिसरात पार्किंगची मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात का, रेल्वेच्या जागेचा वापर पार्किंगसाठी करता येऊ शकतो का, याचाही विचार होणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ठाण्यात येणाऱ्या मेट्रोचा मार्ग स्टेशन परिसरातून वळवल्यास वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होईल आणि स्टेशन परिसरातील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी सूचनाही जंत्रे यांनी केली. (प्रतिनिधी) - ठाणे पूर्वेला जागा कमी आहे. तेथील सॅटीस प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर, प्राधान्याने कोपरी पुलाचे काम होणे अतिशय गरजेचे आहे. पार्किंगची व्यवस्था, बसथांब्याची व्यवस्था, नागरिकांना चालण्याची सुविधा यांचाही आधी विचार होणे अपेक्षित आहे. नवीन ठाणे स्टेशनचे काम जलद गतीने मार्गी लावायला हवे.