शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्ड अंडरग्राऊंड करा

By admin | Updated: March 9, 2017 03:15 IST

ठाण्याचा स्टेशन परिसर आमूलाग्र सुधारणे ही काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्पामुळे काही अंशी वाहतुकीत सुधारणा झाली असली, तरी ती आजच्या घडीला अपुरी आहे.

ठाणे : ठाण्याचा स्टेशन परिसर आमूलाग्र सुधारणे ही काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्पामुळे काही अंशी वाहतुकीत सुधारणा झाली असली, तरी ती आजच्या घडीला अपुरी आहे. तेथील वाहतूक कोंडी फोडाण्यासाठी एकतर तेथील रिक्षा स्टँड, टॅक्सी स्टँड आदी वाहतुकीची पर्यायी साधने परदेशाप्रमाणे अंडरग्राऊंड करण्याची गरज आहे. स्टेशन परिसरातील काही दुकानेही याचपद्धतीने अंडरग्राऊंड केल्यास त्यांनाही चांगली जागा मिळेल आणि स्टेशन परिसरातील कोंडी पुटेल, असे मत ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी मांडले. ठाणे पूर्वेचा सॅटीस प्रकल्प पूर्ण करण्यापूर्वी कोपरी पुलाचे रखडलेले काम आधी मार्गी लागणे गरजेचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. ठाण्यात येणारी मेट्रोही या भागातून वळवल्यास स्टेशन परिसरातील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. ठाण्याच्या अर्थसंकल्पाबाबत अनेक उपयुक्त सूचना करताना ते बोलत होते.स्टेशन परिसरात सुधारणा करण्यासाठी प्रथम हा परिसर हॉकर्स झोन होणे गरजेचे आहे. हा परिसर ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केला असला, तरी तेथे आजही फेरीवाल्यांचे प्रस्थ दिसून येते. त्यामुळे आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास हा परिसर फेरीवालामुक्त होणे हे काळाची गरज आहे. सॅटीस प्रकल्प झाल्याने येथील वाहतूक कोंडी थोड्या फार प्रमाणात का होईना सुटली आहे. तरीदेखील गोखले रोड, शिवाजी चौक येथील रस्त्यांवर आजही वाहतूक कोंडी होते. त्यामुळे बी कॅबीन भागात रेल्वेची जी काही जागा शिल्लक आहे, त्या जागेचा वापर कशा पध्दतीने करता येऊ शकतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. परदेशात स्टेशन परिसरातील वाहतुकीच्या सुविधा किंवा इतर पूरक सुविधा अंडरग्राऊंड स्वरुपात पुरवल्या जातात. ही बाब खचर््िाक जरी असली, तरी ठाणे स्टेशनचा विस्तार, तेथील गर्दी लक्षात घेऊन या पध्दतीने अंडरग्राऊंड वाहतुकीचा प्रयोग केला, तर मोठ्या प्रमाणात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतील. किंबहुना रिक्षा स्टँड आणि टॅक्सी स्टँडही अंडरग्राऊंड केल्यास ते ही फायदेशीर ठरु शकतील. स्टेशन परिसरात पार्किंगची मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात का, रेल्वेच्या जागेचा वापर पार्किंगसाठी करता येऊ शकतो का, याचाही विचार होणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ठाण्यात येणाऱ्या मेट्रोचा मार्ग स्टेशन परिसरातून वळवल्यास वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होईल आणि स्टेशन परिसरातील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी सूचनाही जंत्रे यांनी केली. (प्रतिनिधी) - ठाणे पूर्वेला जागा कमी आहे. तेथील सॅटीस प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर, प्राधान्याने कोपरी पुलाचे काम होणे अतिशय गरजेचे आहे. पार्किंगची व्यवस्था, बसथांब्याची व्यवस्था, नागरिकांना चालण्याची सुविधा यांचाही आधी विचार होणे अपेक्षित आहे. नवीन ठाणे स्टेशनचे काम जलद गतीने मार्गी लावायला हवे.