शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

मर्यादावेल समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: September 25, 2015 02:05 IST

विसर्जनानंतर साचलेले निर्माल्य, प्लास्टीक व पॉलिथीनचा वाढता कचरा आणि अवैध रेती उत्खनन आदी मुळे समुद्रकिनारी नैसर्गिकरित्या धूप नियंत्रणात

बोर्डी : विसर्जनानंतर साचलेले निर्माल्य, प्लास्टीक व पॉलिथीनचा वाढता कचरा आणि अवैध रेती उत्खनन आदी मुळे समुद्रकिनारी नैसर्गिकरित्या धूप नियंत्रणात महत्वपूर्ण योगदान देणारी मर्यादावेल समस्येच्या विळखात सापडली आहे. तत्काळ उपाय न योजल्यास हा अमूल्य ठेवा नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.डहाणू तालुक्यातील बोर्डी, घोलवड, नरपड, चिखले तसेच झाई या गावांना समुद्रकिनाऱ्याचा वरदहस्त लाभला आहे. गेल्या दशकापासून भरतीच्या तडाख्यांनी किनाऱ्याची प्रचंड धूप होत असून किनारा मागे येऊ लागल्याने घरांना धोका उद्भवत आहे. प्रतिवषी सुरू बागेतील वृक्षांची रांग उन्मळून जमीनदोस्त होत आहे. तिवरांची झाडे आणि मर्यादावेल नैसर्गिक धूप नियंत्रणाचे कार्य करतात. पावसाळ्यात तिवरांची बीज अंकुरून रोपटी तयार होतात. पेराद्वारे वाढून वाळुवर फोफावणाऱ्या मर्यादावेलीची घनदाट हिरवी जाळी अल्पावधीत पसरते. त्यामुळे माती घट्ट होऊन दुर्वांसारख्या अन्य गवताची वाढ होते. सोसाट्याच्या वाऱ्यातही धूप नियंत्रीत होते. त्यांची आपट्याच्या आकारातील गर्द हिरवी पाने आणि धोतऱ्याच्या फुलांच्या आकारातील फिकट जांभळ्या रंगातील फुलांनी सौदर्यात भर टाकतात शिवाय जैवविविधता टिकविण्याचे मोलाचे कार्य साधले जाते. दात व पोट दुखीवर तिच्या पानांचा औषधी वापर केला जातो. शेतकरीवर्ग खळ्याच्या रिती करीता तसेच बारसे, लग्नकार्य, अंत्यविधी इ. धार्मिक कार्यात तिला अनन्यसाधारण महत्व आहे.दरम्यान कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यासह प्लास्टीक व पॉलिथीन समुद्रात सोडले जाते. अविवेकी नागरीक तसेच काही ग्रामपंचायतींकडून किनाऱ्यावर कचरा टाकला जातो. गणेश विसर्जनानंतर साचलेल्या निर्माल्याची भर त्यात पडली आहे. अवैध रेती उत्खनन करून सिमेंट पोत्यात भरून रचून ठेवली जाते. रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक करणारी वाहने थेट समुद्रात उतरविली जातात. त्यामुळे मर्यादावेलीची अतोनात हानी होत आहे. रेती उत्खननास पूर्णपणे आळा न बसल्यास समुद्रकिनारा भकास बनेल. त्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर होऊन रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर येईल. या करीता जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यावरणपे्रमींकडून केली जात आहे. (वार्ताहर)