शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावरच

By admin | Updated: May 23, 2017 01:22 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्यादृष्टीने शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तरीदेखील निम्याहून अधिक नागरिकांनी अद्याप कचरा

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्यादृष्टीने शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तरीदेखील निम्याहून अधिक नागरिकांनी अद्याप कचरा वर्गीकरणाला सुरूवात केली नसल्याने त्यांचा कचराच न उचलण्याचे फर्मान पालिकेने जारी केले आहे. यामुळे वर्गीकरण न करणाऱ्यांचा कचरा दोन दिवसांपासून रस्त्यावर पसरू लागला आहे. केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये स्वच्छतेचे सर्र्वेक्षण केल्यानंतर त्यात मीरा-भार्इंदरमधील कचरा वर्गीकरणावर ठपका ठेवण्यात आला. यामुळे स्वच्छतेतील अव्वल क्रमांकातून शहर बाहेर फेकले गेल्याने प्रशासन नाराज झाले आहे. कचऱ्यानेच शहराचा घात केल्याचा रोष प्रशासनाने वर्गीकरणाच्या माध्यमातून थेट नागरिकांवर व्यक्त केला. यात पुरेशी जनजागृती महत्वाची ठरत असली तरी नागरिकांनीही त्याची सवय अंगवळणी पडावी, असा पारदर्शक उद्देश प्रशासनाचा आहे. पालिकेने त्यासाठी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात वर्गीकरणाची सोय खाजगी कंत्राटदाराला उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्याची प्रक्रिया जून, जुलैमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वच्छतेला सुरूवात करावी, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यानुसार प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच नागरिकांना विविध माध्यमांद्वारे कचरा वर्गीकरणाला सुरूवात करण्याचे आवाहन केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अद्यापही कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो एकत्रित साठविण्याची सवय कायम ठेवली आहे. यामुळे काही गृहनिर्माण संस्थांमध्ये खाजगी सफाई कामगारांकडून उचलण्यात येणारा कचरा वर्गीकरणाअभावी दोन दिवसांपासून तसाच ठेवला आहे. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या. तक्ररींवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर सफाई कामागारांकडूनच दोन दिवसानंतर कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीला सुरूवात झाल्याचे काही संस्थांतील रहिवाशांकडून सांगितले जात आहे. परंतु अद्याप तरी त्याचा प्रत्यय आलेला दिसून येत नाही. अशी विचित्र अवस्था आहे.