शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावरच

By admin | Updated: May 23, 2017 01:22 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्यादृष्टीने शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तरीदेखील निम्याहून अधिक नागरिकांनी अद्याप कचरा

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्यादृष्टीने शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तरीदेखील निम्याहून अधिक नागरिकांनी अद्याप कचरा वर्गीकरणाला सुरूवात केली नसल्याने त्यांचा कचराच न उचलण्याचे फर्मान पालिकेने जारी केले आहे. यामुळे वर्गीकरण न करणाऱ्यांचा कचरा दोन दिवसांपासून रस्त्यावर पसरू लागला आहे. केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये स्वच्छतेचे सर्र्वेक्षण केल्यानंतर त्यात मीरा-भार्इंदरमधील कचरा वर्गीकरणावर ठपका ठेवण्यात आला. यामुळे स्वच्छतेतील अव्वल क्रमांकातून शहर बाहेर फेकले गेल्याने प्रशासन नाराज झाले आहे. कचऱ्यानेच शहराचा घात केल्याचा रोष प्रशासनाने वर्गीकरणाच्या माध्यमातून थेट नागरिकांवर व्यक्त केला. यात पुरेशी जनजागृती महत्वाची ठरत असली तरी नागरिकांनीही त्याची सवय अंगवळणी पडावी, असा पारदर्शक उद्देश प्रशासनाचा आहे. पालिकेने त्यासाठी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात वर्गीकरणाची सोय खाजगी कंत्राटदाराला उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्याची प्रक्रिया जून, जुलैमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वच्छतेला सुरूवात करावी, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यानुसार प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच नागरिकांना विविध माध्यमांद्वारे कचरा वर्गीकरणाला सुरूवात करण्याचे आवाहन केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अद्यापही कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो एकत्रित साठविण्याची सवय कायम ठेवली आहे. यामुळे काही गृहनिर्माण संस्थांमध्ये खाजगी सफाई कामगारांकडून उचलण्यात येणारा कचरा वर्गीकरणाअभावी दोन दिवसांपासून तसाच ठेवला आहे. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या. तक्ररींवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर सफाई कामागारांकडूनच दोन दिवसानंतर कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीला सुरूवात झाल्याचे काही संस्थांतील रहिवाशांकडून सांगितले जात आहे. परंतु अद्याप तरी त्याचा प्रत्यय आलेला दिसून येत नाही. अशी विचित्र अवस्था आहे.