शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

अखेर उल्हासनगर शहर झाले हगणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:39 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनिष हिवरे, अलका पवार यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, मुकादम व कर्मचारी यांना याचे श्रेय जाते.राज्यस्तरीय समितीने सहा महिन्यांपूर्वी शहराची पाहणी केली होती. त्यावेळी सार्वजनिक स्वच्छतागृहासह अन्य बाबींवर समितीने ताशेरे ओढून सुधारणा करण्याचे सुचवले होते. महापालिकेला हगणदारीमुक्त करण्यासाठी आयुक्त निंबाळकर यांनी स्वत: गुडमॉर्निंग टीमसह सकाळी सहा वाजता डम्पिंग ग्राउंडसह झोपडपटीच्या परिसराचा दौरा केला. प्रातर्विधीसाठी उघडयावर जाणाºया नागरिकांना समजावत गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. महापालिकेसह एमएमआरडीएच्या एकूण ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती करून त्यांना पाणी व वीजपुरवठा सुरू केला. २ हजार ४६१ वैयक्तिक स्वच्छतागृह गरजूंना बांधून दिली. १० सामूहिक स्वच्छतागृह नव्याने बांधून ३ फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली.स्वच्छ महाराष्ट्र अभियान समितीच्या अहवालात नापास झालेल्या शहराला पास करण्यासाठी आयुक्तांनी उल्हासनगर स्वच्छ व सुंदरचा नारा दिला. त्यांनी गेल्या सहा महिन्यात विविध उपक्रम राबवले. प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम व कर्मचाºयांचे पथक आयुक्तांनी स्थापन करून जनजागृतीवर भर दिला.शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी आयुक्तांसह उपायुक्त संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांच्यासह सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनीष हिवरे, अलका पवार, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांनी प्रयत्न केले.राज्यस्तरीय समितीमध्ये विरार-वसई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त हेरवाडे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, राहुल खंडारे, दयानंद जाधव व किशोर पाटील यांचा समावेश होता. पथकाच्या दोन दिवसाच्या पाहणी नंतर शहराला पथकाने हगणदारी मुक्त असल्याचा अहवाल दिला.ओल्या, सुक्या कचऱ्यासाठी डबेमहापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहेत. त्यापैकी प्रत्येक घरांना ओल्या-सुक्या कचरा ठेवण्यासाठी स्वतंत्र डबे विनामूल्य देणार आहे. तसेच स्वच्छतेबाबत वर्षभर जनजागृती अभियान सुरू ठेवण्याचा मानस मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी व्यक्त केला. प्रत्येक चौक व सोसायटीजवळ मोठी कचरा पेटीही ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्थाशहर हगणदारीमुक्त झाल्याचे राज्यस्तरीय पथकाने जाहीर केले आहे. तरीही काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यातील सांडपाणीरस्त्यावर वाहते. सहा महिन्यात ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती केल्याचा दावा मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी केला आहे.