शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अखेर उल्हासनगर शहर झाले हगणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:39 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनिष हिवरे, अलका पवार यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, मुकादम व कर्मचारी यांना याचे श्रेय जाते.राज्यस्तरीय समितीने सहा महिन्यांपूर्वी शहराची पाहणी केली होती. त्यावेळी सार्वजनिक स्वच्छतागृहासह अन्य बाबींवर समितीने ताशेरे ओढून सुधारणा करण्याचे सुचवले होते. महापालिकेला हगणदारीमुक्त करण्यासाठी आयुक्त निंबाळकर यांनी स्वत: गुडमॉर्निंग टीमसह सकाळी सहा वाजता डम्पिंग ग्राउंडसह झोपडपटीच्या परिसराचा दौरा केला. प्रातर्विधीसाठी उघडयावर जाणाºया नागरिकांना समजावत गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. महापालिकेसह एमएमआरडीएच्या एकूण ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती करून त्यांना पाणी व वीजपुरवठा सुरू केला. २ हजार ४६१ वैयक्तिक स्वच्छतागृह गरजूंना बांधून दिली. १० सामूहिक स्वच्छतागृह नव्याने बांधून ३ फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली.स्वच्छ महाराष्ट्र अभियान समितीच्या अहवालात नापास झालेल्या शहराला पास करण्यासाठी आयुक्तांनी उल्हासनगर स्वच्छ व सुंदरचा नारा दिला. त्यांनी गेल्या सहा महिन्यात विविध उपक्रम राबवले. प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम व कर्मचाºयांचे पथक आयुक्तांनी स्थापन करून जनजागृतीवर भर दिला.शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी आयुक्तांसह उपायुक्त संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांच्यासह सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनीष हिवरे, अलका पवार, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांनी प्रयत्न केले.राज्यस्तरीय समितीमध्ये विरार-वसई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त हेरवाडे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, राहुल खंडारे, दयानंद जाधव व किशोर पाटील यांचा समावेश होता. पथकाच्या दोन दिवसाच्या पाहणी नंतर शहराला पथकाने हगणदारी मुक्त असल्याचा अहवाल दिला.ओल्या, सुक्या कचऱ्यासाठी डबेमहापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहेत. त्यापैकी प्रत्येक घरांना ओल्या-सुक्या कचरा ठेवण्यासाठी स्वतंत्र डबे विनामूल्य देणार आहे. तसेच स्वच्छतेबाबत वर्षभर जनजागृती अभियान सुरू ठेवण्याचा मानस मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी व्यक्त केला. प्रत्येक चौक व सोसायटीजवळ मोठी कचरा पेटीही ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्थाशहर हगणदारीमुक्त झाल्याचे राज्यस्तरीय पथकाने जाहीर केले आहे. तरीही काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यातील सांडपाणीरस्त्यावर वाहते. सहा महिन्यात ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती केल्याचा दावा मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी केला आहे.