शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

उल्हासनगरमध्ये साचणार कचरा?

By admin | Updated: May 24, 2017 01:00 IST

श्रमसाफल्य योजनेत मालकी हक्काची घरे, सफाई कामगारांच्या सरसकट बदल्या, पदोन्नती, नोकरभरती आदीच्या निषेधार्थ भारतीय सफाई मजदूर

सदानंद नाईक। लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : श्रमसाफल्य योजनेत मालकी हक्काची घरे, सफाई कामगारांच्या सरसकट बदल्या, पदोन्नती, नोकरभरती आदीच्या निषेधार्थ भारतीय सफाई मजदूर काँॅग्रेस संघटनेने सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा आयुक्तांना दिला आहे. आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून कामबंद आंदोलनाने शहरात पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. उल्हासनगर महापालिका प्रशासनाने सफाई कामगारांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगार नेते चरणसिंग टांक, राधाकृष्ण साठे, श्याम गायकवाड, दिलीप थोरात यांनी केला आहे. कॅम्प नं-५ वाल्मिकीनगर येथे श्रमसाफल्य योजने अंतर्गत सफाई कामगारांसाठी गृहसंकुल उभे करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी केंद्र सरकारने ८ कोटीचा निधी दिला होता. मात्र पालिका प्रशासन व कंत्राटदाराच्या दुर्लक्षतेमुळे गृहसंकुल योजना ९ वर्ष रखडली. अखेर केंद्र सरकारने योजना मुदतीत पूर्ण केली नाही असा ठपका ठेवत व्याजासह निधी परत मागवला. यामुळे पालिकेवर नामुष्की ओढवली असून कोणताही गाजावाज न करता स्वत:च्या निधीतून गृहसंकुल योजना पूर्ण केले. यापूर्वी पालिका व कंत्राटदाराच्या दुर्लक्षतेमुळे बीएसयूपी योजनेचा ३२ कोटीचा निधीही परत गेल्याने हजारो गरीब नागरिकांना घरे मिळालेली नाहीत. सफाई कामगारांना मिळणाऱ्या मालकी हक्काच्या घरावर गदा आली आहे. पालिकेने २५ वर्ष सेवा झालेले व पूर्वी राहत असलेल्या सफाई कामगारांना मालकी हक्काने तर इतर घरे भाडयाने देण्याचा पवित्रा घेतला आहे. पालिकेच्या या धोरणाला कामगार संघटनेने विरोध केला. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे केंद्र सरकारचा निधी परत गेला असून मागासवर्गीय कामगारांवर अन्याय झाल्याचा आरोप टाक यांनी केला आहे. इतर कामगार संघटना कामगारांच्या पाठीमागे उभ्या राहिल्याने, महापालिका विरूध्द कामगार संघटना असा सामना रंगणार आहे. ३०५ सफाई कामगारांची भरती, नोकरभरती, पदोन्नती, सरसकट बदल्या, गणवेश नाही आदी मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ टाक यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच सरसकट १२५० सफाई कामगारांची बदली आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केल्याचा त्यांनी निषेध केला आहे.