शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

उल्हासनगर-शहाड रस्ता सहा महिने अर्धवटच!

By admin | Updated: March 21, 2016 01:22 IST

शहाड ते पालिकादरम्यानच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराला आठवडाभराचा अल्टीमेटम तसेच पालिका अधिकाऱ्यांवरही

उल्हासनगर : शहाड ते पालिकादरम्यानच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराला आठवडाभराचा अल्टीमेटम तसेच पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मागील चार महिन्यांत सहा जणांचे बळी गेले आहेत.या रस्त्याच्या कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय रिजवान, उपअभियंता जितू चोयथानी, संदीप जाधव यांच्यावर आयुक्तांनी ठपका ठेवला आहे. उल्हासनगर महापालिका ते शहाड रेल्वे स्थानकादरम्यानचा रस्ता भूमिपूजनापासूनच वादात सापडला आहे. रस्त्याचे एकदा नव्हे तर दोनदा राजकीय श्रेय घेण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीकडून भूमिपूजन झाले. मात्र, रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून अर्धवटच आहे. यामुळे चार महिन्यांत सहा जणांचे बळी गेले, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी केला आहे. मृत नातेवाइकांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याची मागणी महासभेने केली आहे. तसेच कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मनोज लासी यांनी केली आहे.या रस्त्यासाठी सरकारने १७ कोटी दिले आहेत. या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते नाना बागुल यांनी कंत्राटदारासह पालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंत्राटदाराच्या रकमेतून मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. रस्त्याचे प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्यावर आयुक्त मनोहर हिरे यांनी हस्तक्षेप करत कंत्राटदाराला काम करण्याचा दम दिला आहे. (प्रतिनिधी)