शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

उल्हासनगरवासीयांना पुन्हा विस्थापित होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST

उल्हासनगर : शहरात अवैध व धोकादायक इमारतींचा प्रश्न उभा ठाकला आहे. शहरवासीयांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे आश्वासन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र ...

उल्हासनगर : शहरात अवैध व धोकादायक इमारतींचा प्रश्न उभा ठाकला आहे. शहरवासीयांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे आश्वासन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढू, असे संकेत दिले.

उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर १० वर्षे जुन्या १५०० पेक्षा जास्त इमारतींना स्ट्रक्चरल नोटिसा दिल्याने धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला. तसेच, सावधगिरीचा उपाय म्हणून धोकादायक यादीतील ११६ इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करून काही इमारतींवर तोडू कारवाई सुरू केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. उल्हासनगर ट्रेड असोसिएशन व धोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे साकडे घातले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे शहरवासीयांच्या समस्या ऐकण्यासाठी शहरातील एका हाॅटेलमध्ये आले होते. यावेळी नागरिकांनी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी वाढीव चार चटईक्षेत्र, जमीन मालकीहक्क, इमारत नियमित करणे, २००६ चा रेडीरेकनर दर लावणे, भिवंडीमध्ये ५०० प्लॉट देणे, इमारतीचा वीज व पाणीपुरवठा खंडित न करणे, इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत देणे आदी मागण्या केल्या.

शहरातील धोकादायक व बेकायदा इमारतींचा प्रश्न उभा ठाकला आहे. नागरिकांना विस्थापित होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देऊन याबाबत १५ दिवसांत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व संबंधितांना सोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. यातून मार्ग काढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी माजी महापौर हरदास माखिजा, पंचम कलानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, नगरसेवक मनोज लासी आदी उपस्थित होते. पालकमंत्री व नगरविकासमंत्री यांनी गेल्या आठवड्यात शहरातील बेकायदा व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. मात्र, ही बैठक रद्द केल्याने शहरवासीयांकडून टीका होत आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड शहरवासीयांना दिलासा देतील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली.

चौकट

आयुक्त दयानिधींबाबत नाराजी कायम

महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशाने १० वर्षे जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट नोटिसा दिल्याने, शहरवासीयांवर विस्थापित होण्याची वेळ आल्याची टीका नागरिकांनी केली. हजारो नागरिकांवर विस्थापितांची वेळ आणल्याबद्दल अशा आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी करून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.