शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

उल्हासनगर महापालिकेला मिळाला नगररचनाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:51 IST

गुडगुडे यांनी स्वीकारला पदभार : कामाला मिळणार आता चालना

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेच्या वादग्रस्त नगररचनाकार विभागाला ए.पी. गुडगुडे यांच्या रूपाने नगररचनाकार मिळाला असून त्यांनी गुरुवारी नगररचनाकारपदाचा पदभार स्वीकारला. धोकादायक इमारती व बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया यापूर्वी त्यांनी सुरू करून पालिकेला १० कोटींचे उत्पन्न मिळवून दिले होते.

महापालिका नगररचनाकार नेहमीच वादात राहिला आहे. यापूर्वीचे बहुतांश नगररचनाकार कोणत्या ना कोणत्या वादात सापडले असून अनेकांवर गुन्हे दाखल होऊन जेलची हवा खावी लागली आहे. चार वर्षांपूर्वी पुणे येथे बैठकीला गेलेले तत्कालीन नगररचनाकार संजीव करपे बेपत्ता झाले. अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांच्या कुटुंबाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. गेल्या वर्षी त्यांच्या सहीने बांधकाम परवान्याला मंजुरी मिळाल्याचा प्रकार उघड झाल्याने पुन्हा विभागाचा सावळागोंधळ उघड झाला होता. करपे यांच्या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणानंतर येथे कोणताही नगररचनाकार येण्यास धजावत नव्हता. मध्यंतरी, आलेले नगररचनाकारही वादात सापडले.

शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित असून बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रियाही ठप्प पडली होती. यापूर्वी गुडगुडे नगररचनाकारपदी असताना बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शंभरपेक्षा जास्त बांधकामे नियमित होऊन पालिकेला १० कोटींच्या दंडात्मक कारवाईतून उत्पन्न मिळवून दिले होते. तसेच दरमहा कोट्यवधींचा महसूल पालिकेला मिळत होता. मात्र, गेल्या चार वर्षांपासून नगररचनाकार विभगापासून मिळणारे उत्पन्न ठप्प झाले. दरम्यान, भिवंडी महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश देव यांच्याकडे प्रभारी नगररचनाकारपदाचा पदभार दिला होता. मात्र, त्यांनी अपवाद सोडल्यास महापालिकेच्या कामकाजाकडे पाठ फिरवली होती. महापालिकेला कायमस्वरूपी नगररचनाकार द्या, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारकडे केली होती.

‘शहर विकासासाठी हवे सहकार्य’शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांचे सहकार्य हवे. नवीन बांधकाम परवानगी, धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढणे आदी अनेक कामे करावी लागणार आहेत. विभागाचे काम अनेक दिवसापांसून ठप्प असल्याने त्याचाही निपटारा करावा लागणार आहे, असे गुडगुडे यांनी सांगितले.