शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

उल्हासनगर महापालिका कर्मचारी पगाराविना, कामगारांत असंतोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 19:15 IST

महापालिका आस्थापनावर दरमहा १९ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १२ कोटी निव्वळ कर्मचारी पगार, सेवानिवृत्त वेतनावर खर्च होतो. मालमत्ता कर विभागाकडून वर्षाला १०० कोटीच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ७१ कोटीची वसुली झाली.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून कामगारांचे अद्यापही पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. कामगार संघटनेचे नेते राधाकृष्ण साठे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यावर सोमवारी वर्ग-४ कर्मचाऱ्यांचा पगार काढण्याचे आश्वासन दिले. 

उल्हासनगर महापालिका कारभारातील सावळागोंधळ पुन्हा उघड झाला. गेल्या महिन्यात शासनाकडून जीएसटी अनुदान मिळाले नसल्याचे कारण देऊन, अर्धा महिना संपल्यानंतर कामगारांचा पगार काढला होता. प्रत्यक्षात मालमत्ता कर विभागाने वसूल केलेली कोट्यवधींची रक्कम गेली कुठे? असा प्रश्न त्यावेळी कामगारांनी केली होती. कामगारांच्या पगारा ऐवजी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची देणी देण्यात धन्यता मानल्याची टीका त्यावेळी सर्वस्तरातून झाली. एप्रिल महिन्यात तरी वेळेत पगार होणार असे आश्वासन दिल्यानंतरही, महिन्याची १२ तारीख उलटूनही पगार झाला नाही. याप्रकारा बाबत कामगारानी नाराजी व्यक्त केली असून घराचे कर्ज हप्ते, इतर खर्च व देणी कसे द्यावी. असा प्रश्न कामगारांना पडला. कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी शुक्रवारी आंदोलन केल्याने, सोमवारी पगार काढण्याचे आश्वासन लेखा विभागाने दिल्याची माहिती साठे यांनी दिली. 

महापालिका आस्थापनावर दरमहा १९ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १२ कोटी निव्वळ कर्मचारी पगार, सेवानिवृत्त वेतनावर खर्च होतो. मालमत्ता कर विभागाकडून वर्षाला १०० कोटीच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ७१ कोटीची वसुली झाली. तर जीएसटी पोटी महापालिकेला शासनाकडून दरमहा १६ कोटी २५ लाखाचे अनुदान मिळते. या अनुदानावर महापालिकेचा कारभार हाकलला जात आहे. मात्र लेखा विभागाकडून कामगारांच्या पगाराला प्राधान्य न देता, ठेकेदारांच्या देणीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे. कामगारांच्या पगारा बाबत महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्या सोबत संपर्क साधला असता, होऊ शकला नाही. तर उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी काही तांत्रिक कारणामुळे पगार रखडल्याचे सांगून सोमवारी पगार होण्याचे संकेत दिले. 

लेखा विभागाकडून उशीर का? टक्केवारीची चर्चा 

महापालिका मालमत्ता कर विभागाने ७१ कोटींची वसुली केल्यानंतरही कामगारांचे पगार वेळेत का नाही?. असा प्रश्न कामगार संघटनेचे नेते विचारीत आहेत. शासनाचे जीएसटी अनुदान एकाद्या महिन्यात उशिराने दिलीतर, कामगारांचा पगार देणार नाही का? असा प्रश्न निर्माण झाला. ठेकेदारांच्या देण्यातून टक्केवारी मिळत असल्यानेच, कामगारांच्या पगार ऐवजी ठेकेदारांची बिले देण्याला प्राध्यान्य दिले जात असल्याचा आरोप कामगार नेते करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर