शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांची उचबांगडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:44 IST

उल्हासनगर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात डॉ. राजा दयानिधी यांना चांगले यश लाभले असले तरी पाणीटंचाई, पाणीचोरी रोखणे, अवैध ...

उल्हासनगर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात डॉ. राजा दयानिधी यांना चांगले यश लाभले असले तरी पाणीटंचाई, पाणीचोरी रोखणे, अवैध बांधकामांना प्रभावीपणे आळा घालणे आदी समस्यांच्या हाताळणीत दयानिधी यांना अपयश आल्याने त्यांची बदली केली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

देशातील सर्वाधिक घनतेच्या उल्हासनगर शहराला कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या बदलीनंतर कोरोना संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आयएएस दर्जाचे डॉ. राजा दयानिधी यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर कोरोनाची संख्या आटोक्यात आली असली तरी, आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. शहरात पाणीटंचाईची समस्या ‘जैसे थे’ असून, पाणी गळती थांबता थांबत नाही. महापालिकेच्या सर्वच विभागांत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची टीका सत्ताधारी शिवसेना व आघाडीतील मित्रपक्षाकडून होत आहे. अवैध बांधकामावर कारवाई होण्याऐवजी प्रभाग अधिकाऱ्यांच्या फक्त बदल्या होत आहेत. मालमत्ता कर व पाणीपुरवठा विभागासाठी अभय योजना लावूनही वसुली नाही. एकूणच महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे.

आयुक्त डॉ. दयानिधी यापूर्वीच्या आयुक्तांप्रमाणे शहराचा पाहणी दौरा का करीत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे, तसेच आयुक्त काही मोजके अपवाद सोडल्यास नगरसेवक, नागरिक व पत्रकारांना भेटत नाहीत. त्यामुळे आयुक्तांसोबत मोठ्या वर्गाचा संवाद नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते ‘आयुक्त बदला, शहर वाचवा’ अशी प्रतिक्रिया खाजगीत देत आहेत. जिल्हास्तरीय नेत्यांकडे आयुक्त बदलाची मागणी केली आहे, अशी चर्चा आहे. नवी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची आयुक्तपदी निवड होणार आहे, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत आयुक्त डॉ. दयानिधी यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो झाला नाही.

..........