शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत स्वछता अभियानाचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या फज्जा उडाला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या फज्जा उडाला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील अंजूरफाटा येथे रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा कचरा रस्त्याच्या कडेला पसरला असल्याने कचऱ्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया हे शहर स्वच्छतेसाठी अतोनात प्रयत्न करत असताना काही कर्मचारी व अधिकारी मात्र शहराच्या स्वच्छ भारत अभियानालाच तिलांजली देण्याचे काम करत असल्याने कचऱ्याचे ढीग साचत आहेत. विशेष म्हणजे शहरातील कचऱ्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सकाळी व रात्री कचरा उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे देखील पुरते दुर्लक्ष होत आहे.

या दुर्लक्षित कारभारामुळे शहरात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत. या अभियान अंतर्गत दरमहा कचरा उचलणाऱ्या घंटागाडी ठेकेदारावर ९० लाख खर्च केला जातो. अनेक ठिकाणी ठेकेदाराकडून नियमित कचरा उचला जात नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी वेळोवेळी केल्या आहेत . तसेच औषध फवारणीही वेळेवर होत नसल्याने कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.