शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

भिवंडीत स्वछता अभियानाचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या फज्जा उडाला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या फज्जा उडाला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील अंजूरफाटा येथे रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा कचरा रस्त्याच्या कडेला पसरला असल्याने कचऱ्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया हे शहर स्वच्छतेसाठी अतोनात प्रयत्न करत असताना काही कर्मचारी व अधिकारी मात्र शहराच्या स्वच्छ भारत अभियानालाच तिलांजली देण्याचे काम करत असल्याने कचऱ्याचे ढीग साचत आहेत. विशेष म्हणजे शहरातील कचऱ्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सकाळी व रात्री कचरा उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे देखील पुरते दुर्लक्ष होत आहे.

या दुर्लक्षित कारभारामुळे शहरात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत. या अभियान अंतर्गत दरमहा कचरा उचलणाऱ्या घंटागाडी ठेकेदारावर ९० लाख खर्च केला जातो. अनेक ठिकाणी ठेकेदाराकडून नियमित कचरा उचला जात नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी वेळोवेळी केल्या आहेत . तसेच औषध फवारणीही वेळेवर होत नसल्याने कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.