शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

‘शहरी जंगलां’साठी दोन लाख वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:49 IST

राज्य शासनाचा उपक्रम : जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांचे तंत्रज्ञान

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राच्या विविध भागांमध्ये गेल्या चार वर्षांत सहा लाख वृक्षांची लागवड करण्यापाठोपाठ आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या ‘शहरी जंगले’ या संकल्पनेवर आधारित दोन लाख वृक्षलागवडीचा संकल्प केला असून यावर दोन कोटी रु पये खर्च करण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

पर्यावरणसंवर्धन आणि हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आखले होते. या योजनेचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने गेल्या चार वर्षांत सहा लाख वृक्षलागवड केली. शहरातील मोकळे तसेच आरक्षित भूखंड, रस्ते दुतर्फा, वनविभागाचे भूखंड याठिकाणी ती केली आहे. यातील जिवंत असल्याची टक्केवारी ७९ टक्के इतकी आहे, तर गेल्या दोन वर्षांत लागवड केलेली रोपे जिवंत असल्याची टक्केवारी ८३.१२ टक्के इतकी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय, खाडीकिनारी भागात मोठ्या प्रमाणात खारफुटीची लागवड केल्याचा दावाही केला आहे.

राज्य शासनाने यंदाच्या वर्षी ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचे जाहीर केले असून महापालिकेला दोन लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाने सात ते आठ फूट उंचीचे स्थानिक प्रजातींचे वृक्षलागवडीचे नियोजन करून त्यासाठी जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या ‘शहरी जंगले’ या संकल्पनेचा आधार घेतला आहे. त्यानुसार या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया होईल.अशी आहे संकल्पना... : मियावाकी जंगलांचा आकार निश्चित केल्यानंतर त्याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने तीन फूट खोदून माती काढलेला भाग एकसमान करून त्याठिकाणी शंभर लीटर जीवामृत झारीने पाणी शिंपडण्यात येते. जीवामृत हे गायीचे मलमूत्र, दूध, दही आणि तुपापासून तयार करण्यात येते. खड्ड्यांतून बाहेर काढलेल्या मातीतून दगड, विटांचे तुकड्यांसह काच आणि प्लास्टिक बाहेर काढून त्यामध्ये १५०० किलो भाताचे कुस-कोंडा, १५०० किलो कुजलेले शेणखत टाकतात.तसेच शंभर किलो घन जीवामृत टाकून हे मिश्रण एकत्र करून ते खोदलेल्या खड्ड्यांत टाकण्यात येते. खड्डा भरत असताना प्रत्येक एक फूट उंचीवर दोनशे लीटर जीवामृत झारीने शिंपडण्यात येते. त्यावर चारशे झाडे लावून त्यांना बांबूने आधार देण्यात येतो. झाडे लावताना आतील आणि बाहेरच्या बाजूला एक फूट जागा मोकळी सोडण्यात येते. प्रत्येक झाडाला शंभर मिली जीवामृत देण्यात येते. सर्व झाडे लावल्यानंतर उसाच्या पाचरटाचा ६ इंच जाडीचा थर देऊन बाहेरून-आतून काथ्याने बांधून त्यावर जीवामृत झारीने शिंपडून ही वृक्षलागवड करण्यात येते.

या प्रजातींच्या वृक्षांची होणार लागवड : प्राजक्ता, गुंज, शेवगा, लिंबू, डाळिंब, बहावा, ताह्मण, भोकर, खैर, आंबा, कडुलिंब, बेल, अर्जुन, अंजन, कामिनी, सोनचाफा, टिकोमा, शंकासूर, बिट्टी, कणेर, हिरडा, बेहडा, अडुळसा, अनंत आणि इतर प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे.