शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

‘शहरी जंगलां’साठी दोन लाख वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:49 IST

राज्य शासनाचा उपक्रम : जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांचे तंत्रज्ञान

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राच्या विविध भागांमध्ये गेल्या चार वर्षांत सहा लाख वृक्षांची लागवड करण्यापाठोपाठ आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या ‘शहरी जंगले’ या संकल्पनेवर आधारित दोन लाख वृक्षलागवडीचा संकल्प केला असून यावर दोन कोटी रु पये खर्च करण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

पर्यावरणसंवर्धन आणि हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आखले होते. या योजनेचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने गेल्या चार वर्षांत सहा लाख वृक्षलागवड केली. शहरातील मोकळे तसेच आरक्षित भूखंड, रस्ते दुतर्फा, वनविभागाचे भूखंड याठिकाणी ती केली आहे. यातील जिवंत असल्याची टक्केवारी ७९ टक्के इतकी आहे, तर गेल्या दोन वर्षांत लागवड केलेली रोपे जिवंत असल्याची टक्केवारी ८३.१२ टक्के इतकी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय, खाडीकिनारी भागात मोठ्या प्रमाणात खारफुटीची लागवड केल्याचा दावाही केला आहे.

राज्य शासनाने यंदाच्या वर्षी ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचे जाहीर केले असून महापालिकेला दोन लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाने सात ते आठ फूट उंचीचे स्थानिक प्रजातींचे वृक्षलागवडीचे नियोजन करून त्यासाठी जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या ‘शहरी जंगले’ या संकल्पनेचा आधार घेतला आहे. त्यानुसार या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया होईल.अशी आहे संकल्पना... : मियावाकी जंगलांचा आकार निश्चित केल्यानंतर त्याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने तीन फूट खोदून माती काढलेला भाग एकसमान करून त्याठिकाणी शंभर लीटर जीवामृत झारीने पाणी शिंपडण्यात येते. जीवामृत हे गायीचे मलमूत्र, दूध, दही आणि तुपापासून तयार करण्यात येते. खड्ड्यांतून बाहेर काढलेल्या मातीतून दगड, विटांचे तुकड्यांसह काच आणि प्लास्टिक बाहेर काढून त्यामध्ये १५०० किलो भाताचे कुस-कोंडा, १५०० किलो कुजलेले शेणखत टाकतात.तसेच शंभर किलो घन जीवामृत टाकून हे मिश्रण एकत्र करून ते खोदलेल्या खड्ड्यांत टाकण्यात येते. खड्डा भरत असताना प्रत्येक एक फूट उंचीवर दोनशे लीटर जीवामृत झारीने शिंपडण्यात येते. त्यावर चारशे झाडे लावून त्यांना बांबूने आधार देण्यात येतो. झाडे लावताना आतील आणि बाहेरच्या बाजूला एक फूट जागा मोकळी सोडण्यात येते. प्रत्येक झाडाला शंभर मिली जीवामृत देण्यात येते. सर्व झाडे लावल्यानंतर उसाच्या पाचरटाचा ६ इंच जाडीचा थर देऊन बाहेरून-आतून काथ्याने बांधून त्यावर जीवामृत झारीने शिंपडून ही वृक्षलागवड करण्यात येते.

या प्रजातींच्या वृक्षांची होणार लागवड : प्राजक्ता, गुंज, शेवगा, लिंबू, डाळिंब, बहावा, ताह्मण, भोकर, खैर, आंबा, कडुलिंब, बेल, अर्जुन, अंजन, कामिनी, सोनचाफा, टिकोमा, शंकासूर, बिट्टी, कणेर, हिरडा, बेहडा, अडुळसा, अनंत आणि इतर प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे.